'मनोहर जोशींचं मत ही शिवसेनेची भूमिका नाही' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 11, 2019

'मनोहर जोशींचं मत ही शिवसेनेची भूमिका नाही'

https://ift.tt/2E2Xvrj
मुंबई: 'शिवसेना आणि भाजपनं एकत्र काम केल्यास दोघांचाही फायदा होईल,' हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यांचं वक्तव्य शिवसेनेनं खोडून काढलं आहे. 'मनोहर जोशी यांनी मांडलेलं मत ही त्यांची वैयक्तिक भावना आहे. ती पक्षाची भूमिका नाही,' असं शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. यांनी स्पष्ट केलं आहे. 'शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष एकत्र राहिले असते तर ते योग्य झाले असते. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून आपसात भांडण्यापेक्षा काही सहन करावं. काही गोष्टींसाठी आग्रह धरावा. ज्यावेळी कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही. त्यावेळी आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न होत असतो. शिवसेना व भाजपच्या बाबतीत हे झालंय. सध्याच्या स्थितीत दोन्ही पक्षांना ही युती नको आहे. मात्र, शिवसेना भाजपसोबत कधीच जाणार नाही, असं नाही. योग्य वेळी उद्धव ठाकरे योग्य भूमिका घेतील, अशी अपेक्षा मनोहर जोशी यांनी व्यक्त केली होती. जोशी यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. वाचा: हा संभ्रम अधिक वाढू नये म्हणून शिवसेनेनं लगेचच भूमिका स्पष्ट केली. 'मनोहर जोशी यांचं ते वैयक्तिक मत आहे. ती शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही. जुन्या पिढीतील नेत्यांची तशी भावना असणं स्वाभाविक आहे,' असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. वाचा: वेगळ्या विचारधारा असल्या तरी समान किमान कार्यक्रमावर महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. मात्र, शपथविधीला १४ दिवस उलटले तरी अद्याप खातेवाटप होऊ शकलेले नाही. महत्त्वाच्या खात्यांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास हे सरकार किती काळ तगेल, असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर मनोहर जोशी यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. वाचा: