नवी दिल्ली : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सकाळी ११.०० वाजता संसदेसमोर सादर करणार आहेत. यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण या तिसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. (अपडेट बातमी वाचण्यासाठी वेबपेज रिफ्रेश करा) ठळ्ळक घडामोडी : - सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प असेल. 'सबका साथ, सब विकास, सबका विश्वास' या मोदींच्या घोषवाक्यावर सरकारनं आत्मनिर्भर पॅकेजची घोषणारी केली होती. याद्वारे भारताला करोना महामारीतून वाचवण्यासाठी तसंच अर्थव्यवस्थेला तेजीनं रुळावर आणण्यासाठी नवी दिशा देण्यात आली होती : , अर्थ राज्यमंत्री - संसदेत आज अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या घरी पूजा-अर्चना केली. - अर्थसंकल्प सादर करताना एक ऐतिहासिक निर्णय संसदेद्वारे घेण्यात आलाय. यंदाचा अर्थसंकल्प हा 'पेपरलेस' पद्धतीने मांडला जाणार आहे. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाची छपाई न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. - १ फेब्रुवारी अर्थसंकल्प संसदेत सादर होण्यापूर्वी भारताचे यांनी शुक्रवारी आर्थिक सर्वेक्षण सादर केलं. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवसाऐवजी फेब्रुवारीच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.