शेतकऱ्यांना चिरडलं, मंत्रीपुत्र आशिष मिश्रा विरुद्ध गुन्हा दाखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 4, 2021

शेतकऱ्यांना चिरडलं, मंत्रीपुत्र आशिष मिश्रा विरुद्ध गुन्हा दाखल

https://ift.tt/2Ygj9W5
लखीमपूर खीरी, उत्तर प्रदेश : 'जेव्हापर्यंत दोषीला अटक होत नाही तेव्हापर्यंत लखीमपूर खीरीमध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाहीत', असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. यापूर्वी लखीमपूर प्रकरणात केंद्रीय मंत्री यांचा मुलगा याच्यविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी १४ जणांविरोधात एक केली आहे. मात्र, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांची उत्तर प्रदेशत पोलिसांकडून कलम ३०२२, १२० बी आणि इतर कलमांसहीत ही एफआयआर दाखल करण्यात आलीय. रविवारी, लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्रीपुत्र आशिष मिश्रा यानं आंदोलकांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचा आरोप करण्यात येतोय. या हिंसेत चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले आहेत. यानंतर दोषींना अटक करण्यात यावी, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. मंत्र्यांकडूनही एफआयआर दाखल दुसरीकडे, भाजप मंत्र्यांकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. 'काही शेतकरी शांतीपूर्ण पद्धतीनं विरोध प्रदर्शन करत असल्याची सूचना आम्हाला मिळाला होती. त्यामुळे आम्ही रस्ता बदलला. याच दरम्यान, शेतकऱ्यांत लपलेल्या काही अराजक तत्त्वांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओही आमच्याकडे आहे', असं केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांनी या घटनेबद्दल म्हटलंय. दरम्यान, या घटनेच्या राजकारणालाही सुरूवात झालीय. लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनाही पोलिसांनी चेकिंग दरम्यान रोखण्यात आलंय.