
विशाखापट्टणम: भारताने कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी दणदणीत मात करत मालिकेत १-० अशी विजयाची आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात मोहम्मद शमी (५/३५) आणि रवींद्र जडेजा (४/८७) यांनी सर्वाधिक बळी मिळवत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी ९ बळींची आवश्यकता होती. लय सापडलेल्या टीम इंडियाने दिवसाच्या दोन सत्रांमध्येच हा विजय आपल्या नावे केला.