देशात गेल्या २४ तासांत ४ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 11, 2020

देशात गेल्या २४ तासांत ४ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

https://ift.tt/2A97mNl
नवी दिल्ली: देशात कोरोना रूग्णांची संख्या ६७ हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत ४ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०० रुग्ण मरण पावले आहेत. ताज्या माहितीनुसार, देशभरात एकूण रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ इतकी झाली आहे. यांपैकी एकूण २ हजार २०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २० हजार ९१७ रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील सक्रिय प्रकरणांची संख्या ४४ हजार २९ इतकी आहे. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसत आहे. राज्यात आतापर्यंत २२ हजार १७१ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यांपैकी ८३२ रुग्ण मरण पावले आहेत, तर ४,१९९ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत ८ हजार १९४ लोकांना करोनाची लागण झाली आहे. तर एकूम ४९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडू तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. या राज्यात आतापर्यंत, ७,२०४ रुग्ण आढळले आहेत. यांपैकी एकूण ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या सुमारे ७ हजारांवर पोहोचली आहे. आतापर्यंत दिल्लीत ६,९२३ रुग्ण आढळले आहेत. त्यांपैकी एकूण ७३ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. यानंतर राजस्थानमध्ये ३,८१४ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, राज्यात एकूण १०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर, मध्य प्रदेशात आतापर्यंत ३,६१४ रुग्ण आढळले असून, त्यांपैकी आतापर्यंत एकूण २१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातही कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. या राज्यात सध्या ३,४६७ करोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांपैकी एकूण ७४ रुग्णांचा बळी गेला आहे.