'अधिकाऱ्यांवर वचक ठेवायचाय?; सोबत पोरं घेऊन जा, दणकादणकी करा' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 10, 2020

'अधिकाऱ्यांवर वचक ठेवायचाय?; सोबत पोरं घेऊन जा, दणकादणकी करा'

https://ift.tt/30JcR06
सोलापूर: अधिकाऱ्यांवर वचक ठेवायचा असेल तर दणकादणकी करा. जरा सोबत चार-पाच दणकट पोरं घेऊन अधिकाऱ्यांना भेटत जा. सतत आमच्याकडेच यायला पाहिजे असं नाही, असा अजब सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री यांनी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांना दिला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित करताना बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना हा अजब सल्ला दिला आहे. मी अनेक जिल्हे फिरलो. पण अधिकारी ऐकत नसल्याची तक्रार पहिल्यांदाच ऐकली. बाकीचे लोक तिथल्या तिथं प्रश्नमार्गी लावतात. आपलंच कुठं तरी चुकतंय हे कळायला पाहिजे. तुमचाही धाक दाखवा. धाक निर्माण केला पाहिजे, असं बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. चुकीचं वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपला धाक असावा. चुकीचं काम करता येणार नाही, याची भावना अधिकाऱ्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक गोष्ट रिमोट कंट्रोलवर चालत नाही. तुम्ही तक्रार करायची आणि आम्ही अधिकाऱ्यांना निलंबित करायचं असं चालणार नाही. अधिकाऱ्यांवर केवळ मंत्र्यांचा धाक असून चालणार नाही. तुमचाही धाक असायला हवा, असा अजब सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तुम्ही एकजुटीने अधिकाऱ्यांना भेटा. चार-पाच दणकट पोरं सोबत ठेवा. दोन इकडं दोन तिकडं बसवा. युवक काँग्रेसची दणकादणकी सुरू करा. आपोआप सर्व सुरळीत होईल, असे आदेशच थोरात यांनी कार्यकर्त्यांना दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दंगा करा तर, अधिकाऱ्यांशी चर्चा करा. त्यातून प्रश्न सोडवा. भीक मागितली तर कोणी देत नाही. हिसकावून घ्यायला शिका. तो आपला हक्कच आहे. त्यासाठी दंगा करा. तक्रार करू नका, असा अजब सल्ला महिला आणि बालविकास मंत्री यांनी दिला आहे. तालुका अध्यक्षांनी आमच्याकडे तक्रारच करू नये. अख्खा तालुका तुम्हाला सांभाळायला दिला आहे. तुम्हाला तालुका अध्यक्ष केलं आहे. आम्हीच जर तालुका सांभाळला तर तुम्ही काय करणार?, असा सवाल करतानाच आम्ही तुम्हाला ताकद देण्याचं काम नक्कीच करू, असंही ठाकूर यांनी सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, या सर्व प्रकारावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे. टगेगिरी हीच महाभकास आघाडीतील मित्रपक्षांची संस्कृती असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे.