पॅन्गाँग: भारताच्या आक्रमक कारवाईनंतर चीनचे 'मिशन डॅमेज कंट्रोल' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 2, 2020

पॅन्गाँग: भारताच्या आक्रमक कारवाईनंतर चीनचे 'मिशन डॅमेज कंट्रोल'

https://ift.tt/3lFBDqr
बीजिंग: लडाखमध्ये पॅन्गाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळील भागात चीनच्या घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला. भारताच्या या आक्रमकतेनंतर चीनची नाचक्की झाली. त्यानंतर आता चीनकडून आपली बाजू सावरण्यासाठी 'मिशन डॅमेज कंट्रोल' सुरू करण्यात आले आहे. मागील २४ तासांमध्ये चीनकडून पाच वक्तव्ये जारी करण्यात आली आहेत. यामध्ये दोन वक्तव्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून, एक वक्तव्य चिनी लष्कराकडून, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून एक आणि भारतातील चिनी दूतावासाकडून एक वक्तव्य जारी करण्यात आले आहे. पॅन्गाँग सरोवराजवळ भारत-चीनच्या सैन्यामध्ये संघर्ष झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजीन यांनी सांगितले की, चीनचे सैन्य कायमच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पालन करतात. त्यांनी कधीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नसल्याचाही दावा त्यांनी केला. भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि चीन राजनयिक आणि सैन्यांच्या माध्यमातून चर्चा करत आहेत. चर्चेतून काही सकारात्मक बाबी समोर आल्यास आम्ही तुम्हाला सांगणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. वाचा: चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हवाल्याने म्हटले की, भारतीय सैन्याने दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या चर्चेत सहमती झालेल्या निर्णयाचे उल्लंघन केले आहे. सोमवारी भारतीय सैन्याने जाणूनबुजून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली असल्याचा आरोप ग्लोबल टाइम्सने केला आहे. भारताची ही कृती चीनला उकसवण्यासाठी होती असेही त्यांनी म्हटले. वाचा: भारतीय जवानांच्या या आक्रमकतेमुळे चीन सैन्यच नव्हे तर चीन सरकारही बॅकफूटला गेले असल्याचे चित्र आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वाँग यी यांनी म्हटले की, भारत आणि चीन दरम्यान सीमा निश्चित झाली नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना होत राहणार. दोन्ही देशांचे नेतृत्व कायम सहमतीने घेतलेले निर्णय लागू करण्याबाबत आणि मतभेदांचे रुपांतर वाद होईल असे कोणतेही कृत्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. भारत-चीन या दोन्ही देशामध्ये सध्या असलेल्या परिस्थितीमुळे जगाचे लक्ष लागले आहे. चीन आणि भारता दरम्यान सीमाच निश्चित नाही. त्यामुळे असे प्रश्न उद्वभवत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतासोबत चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ड्रॅगन आणि हत्तीने एकमेकांशी लढण्याऐवजी एकमेकांना सहकार्य करायला हवे. दोन्ही देशांनी वादाऐवजी दोन्ही देशांच्या हितांना प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा: भारतीय सैनिकांनी ३१ ऑगस्टला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अतिक्रमण केल्याचा आरोप भारतातील चीनच्या दूतावासाने केला. चीनी दूतावासाचे प्रवक्ता पुढे म्हणाला की,'भारतीय सैनिकांनी अतिक्रमण केल्यानंतर डिवचण्याची कारवाई केली. त्यामुळे सीमाभागात पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.' भारताने चीनच्या क्षेत्रीय सार्वभौमत्वाला आव्हान दिले असल्याचेही ते म्हणाले. भारताने उचललेल्या या पावलामुळे चीनच्या सार्वभौमत्वाचे मोठे उल्लंघन झाले असल्याचे त्यांनी म्हटले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून माघारी जावे अशी मागणी केली. सीमा प्रश्नी असलेला वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चीनच्या सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नसल्याचा दावा त्यांनी केला.