जसवंत सिंह: पुस्तकामुळे वाजपेयींचा हनुमान बनला भाजपचा खलनायक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 27, 2020

जसवंत सिंह: पुस्तकामुळे वाजपेयींचा हनुमान बनला भाजपचा खलनायक

https://ift.tt/3j8O4t4
नवी दिल्लीः माजी केंद्रीय मंत्री आता आपल्यात नाहीत. १९६० मध्ये लष्करातील मेजर पदाचा राजीनामा देऊन जसवंत सिंह यांनी राजकारणात प्रवेश केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमधील कारकीर्दीत ते अव्वल मंत्री होते. १९९८ ते २००४ च्या कार्यकाळात जसवंत सिंह हे अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. जसवंत सिंह यांची राजकीय कारकीर्द बर्‍याच चढ-उतारांमधून गेली. १९९९ मध्ये एअर इंडियाच्या विमान अपहरणातील प्रवाशांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांसोबत कंदहारला गेल्याने त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. जसवंत सिंह हे अटलबिहारी वाजपेयींचे निकटवर्तीय आणि विश्वासू होते. ब्रजेश मिश्र आणि प्रमोद महाजन यांच्यासह वाजपेयींच्या टीमचे ते महत्त्वाचे सदस्य होते. ऑगस्ट २००९ मध्ये त्यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्यावर पुस्तक लिहिले होते. 'जिन्नाः भारताची फाळणी आणि स्वतंत्र्य' या पुस्तकातून त्यांनी जिन्नांची प्रशंसा केली. यामुळे त्यांची भाजपतून हकालपट्टी करण्यात आली होती. सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरुंना पुस्तकातून जसवंत सिंह यांनी फाळणीसाठी दोषी ठरवले होते. हे आरएसएसला पसंत नव्हते, असं सांगितलं जातं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बाडमेर-जैसलमेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या वरिष्ठ नेत्यांना बाजूला करण्याच्या मार्गावर होती. तर त्यावेळी काही दिवसांपूर्वीच पक्षात सहभागी झालेल्या कॉंग्रेसचे नेते सोनाराम चौधरी यांना उमेदवारी दिली गेली. यावरून जसवंत सिंह यांचे समर्थक संतप्त झाले. सोनाराम हे निवडणूक जिंकले. पण त्यांना उमेदवारी देणं हा भाजपकडून धक्कादायक निर्णय होता. सोनाराम यांना भाजपने उमेदवारी दिल्याने जसवंत सिंह यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास कार्यकर्त्यांनी दबाव टाकला होता. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री बनवण्यात भैरोंसिंह शेखावत यांच्यासह जसवंत सिंह यांची महत्त्वाची भूमिका होती. पण नंतर वसुंधरा राजे यांनी भैरोंसिंह यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आपल्या राजकीय गुरूचा अपमान कसा जसवंत सिंह यांना सहन झाला नाही. तसंच राजस्थानमधील वर्चस्वाच्या लढाईमुळे जसवंत सिंह आणि वसुंधरा राजेमधील संबंध बिघडत गेले. त्यांना उमेदवारी न मिळण्यात वसंधरा राजेंचीही मोठी भूमिका होती, असं बोललं जातं. जसवंत सिंह यांना दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात २५ जूनला दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाले होते. हृदयविकाराचा झटका आल्याने रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्याची करोना चाचणी केली गेली होती. चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.