आश्चर्य! रात्रभर फिरली वरात; वधूचे घर सापडलेच नाही, शेवटी... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 14, 2020

आश्चर्य! रात्रभर फिरली वरात; वधूचे घर सापडलेच नाही, शेवटी...

https://ift.tt/3a357LA
वाराणसी: लग्नाच्या या मोसमात उत्तर प्रदेशातील एका वराचे आकांक्षांचा क्षणात चक्काचूर झाला. त्याचे झाले असे, की आझमगड येथे राहणाऱ्या या युवकाचा १० डिसेंबर या दिवशी मऊ जिल्ह्यात निश्चित करण्यात आला होता. विवाहाच्या रात्री वरासह संपूर्ण वऱ्हाडाने संपूर्ण मऊ धुंडाळले मात्र वराला (groom) वधुचा (bride) पत्ताच सापडला नाही. तसेच वधुच्या कुटुंबीयांची देखील कोणतीही माहिती मिळू शकली नाही. कोणताही उपाय न उरल्याने शेवटी वरासह संपूर्ण वऱ्हाडाला हात हलवत माघारी परतावे लागले. ( searched for the all night) हा विवाह जुळवण्यात एक महिला मध्यस्थी होती. वराच्या संपूर्ण कुटुंबीयांनी या प्रकरणाचा संपूर्ण राग या मध्यस्थी महिलेवर काढला. त्यांनी या महिलेला पकडून शनिवारी रात्री बंधक बनवले. यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात मोठा गोंधळ निर्माण झाला. आपल्यालाही वधुच्या कुटुंबीयांनी मूर्ख बनवल्याचे या महिलेचे म्हणणे होते. वराच्या कुटुंबीयांनी हा विवाह जुळवून देणाऱ्या महिलेविरोधात गंभीर आरोप केले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक शमशेर यादव यांनी सांगितले. आम्ही दोन्ही पक्षांना हे प्रकरण चर्चेद्वारे सोडवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शनिवारी रात्री दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली आणि वराकडील मंडळींनी त्या महिलेविरोधात तक्रार नोंदवली नाही, असे यादव म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- वधुच्या कुटुंबीयांना दिले होते २० हजार रुपये वराकडील मंडळी छतवारा येथे राहणाऱ्या या महिलेच्या संपर्काक आला होता. याच महिलेने मुलाचे जुळवण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर ही महिला मऊ येथे राहणाऱ्या एका मुलीचे स्थळ घेऊन आली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी विवाहाचा कार्यक्रम निश्चित केला. मात्र चूक ही झाली की या काळात वराकडील मंडळी वधुच्या घरी गेलीच नाहीत. विवाहाची तारीख निश्चित केली गेली आणि त्यानंतर वराच्या कुटुंबीयांनी बेंडबाजा आणि लायटिंगसाठी वधुच्या कटुंबीयांना २० हजार रुपये दिले होते. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-