एडिलेड: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताचा कर्णधार () याला शतक पूर्ण करता आले नाही. विराट ७४ धावांवर धावबाद झाला. या सामन्यात विराटने भारतीय क्रिकेटमधील ५१ वर्ष जुना विक्रम मोडला. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी भारताने पहिल्या डावात २४४ धावा केल्या. भारताकडून विराटने सर्वाधिक ७४ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी भारताचे अखेरचे चार फलंदाज फक्त ११ धावात बाद झाले. पण पहिल्या दिवशी विराटने ७४ धावा करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात ८५१ धावा केल्या. भारती कर्णधारकडून करण्यात आलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत. याआधी हा विक्रम () यांच्या नावावर होता. पटौदी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार म्हणून ८२९ धावा केल्या होत्या. त्यांनी ११ कसोटी ४३.६३च्या सरासरीने ८२९ धावा केल्या होत्या. यात एका शतकाचा समावेश होता. या ११ कसोटी त्यांनी १९६४ ते १९६९ या काळात खेळल्या होत्या. वाचा- विराट कोहलीने फक्त पटौदी यांचा विक्रम नाही तर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधारचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. याबाबत त्याने माजी कर्णधार महेंद्र सिह धोनीला मागे टाकेल. धोनीने ८१३ धावा केल्या होत्या. वाचा- भारताचा कर्णधार विराटने एडिलेडमधील अर्धशतकासह आणखी एक विक्रम केला. त्याने या मैदानावर ५०० धावा पूर्ण केल्या. विराटने प्रथमच एखाद्या मैदानावर ५०० धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एखाद्या मैदानावर ५०० धावा करणारा तो सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नंतरचा तिसरा फलंदाज ठरला आहे. सचिनने सिडनी मैदानावर ७८५ लक्ष्मणने ५८९ धावा केल्या होत्या.