प्रकाश आंबेडकरांना आता 'तो' अधिकार नाही: रामदास आठवले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 29, 2020

प्रकाश आंबेडकरांना आता 'तो' अधिकार नाही: रामदास आठवले

https://ift.tt/2KZzJmO
अहमदनगर: ‘ यांची भाजपला आवश्यकता नाही. आंबेडकर यांना घेतल्यामुळे भाजपची फार मोठी ताकद वाढेल, असे अजिबात नाही. आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीचा एकही आमदार व खासदार निवडून आलेला नाही, त्यांनी फक्त मते खाण्याशिवाय काही केलेले नाही. त्यामुळे समाजाला त्याचा काहीही फायदा झालेला नाही. समाजाला फायदा होण्यासाठी त्यांनी एनडीएमध्ये यावं असे मी म्हणालो होतो, पण तशी त्यांची भाजपला काहीही गरज नाही,’ अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री यांनी नगरमध्ये बोलताना दिली. 'रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार आता प्रकाश आंबेडकरांना नाही,' असंही ते म्हणाले. ( on ) ‘भाजपकडे अगोदरच बहुमत आहे. प्रकाश आंबेडकर यांना घेऊन भाजपची फार मोठी ताकद वाढेल, असे नाही,’ असे सांगतानाच आठवले पुढे म्हणाले, ‘मी माझे मत व्यक्त केले होते की प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी तयारी आहे. पण त्यांचा रिपब्लिकन ऐक्याला अजिबात प्रतिसाद नाही. प्रकाश आंबेडकर यांचा आता रिपब्लिकन सोबत संबंध राहिला नाही. कारण त्यांनी स्थापन केली असून रिपब्लिकन म्हणण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यामुळे आता ऐक्य होणे अशक्य आहे. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच्या बळावर निवडणूक लढवून मते चांगली घेतली. परंतु एकही आमदार त्यांचा निवडून आला नाही. त्यांच्या मते खाण्याच्या राजकारणामुळे समाजाला फायदा होणार नाही. त्यासाठी त्यांनी कुठल्या तरी पक्षासोबत युती करणे आवश्यक आहे. ज्यावेळी काँग्रेससोबत आम्ही युती केली, तेव्हा आमचे चार खासदार निवडून आले होते. त्यामुळे एकटे लढून मते खाण्याचे राजकारण करण्यापेक्षा निवडून येण्याचे राजकारण करणे आवश्यक आहे. त्यासाठीच प्रकाश आंबेडकर यांनी एनडीए सोबत यावे, अशी भूमिका मांडली. भाजपला त्यांची काही आवश्यक नाही,’ याचा पुनरुच्चारही आठवले यांनी आवर्जून केला. आम्ही नाही तर ईडी तुमच्या नादाला लागलीय अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस आल्यावरून राज्यात चांगलेच राजकारण पेटले आहे. रामदास आठवले यांनी त्यावरही भाष्य केले. ‘आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आम्ही तुमच्या नादाला लागलो नाही, तर ईडी तुमच्या नादाला लागली आहे,’ असा टोला आठवले यांनी संजय राऊत यांना लगावला. ‘संजय राऊत हे माझे चांगले मित्र आहेत. राज्यसभेत अनेकदा आम्ही जवळजवळ बसलो आहोत. अलिकडे आमच्यात दुरावा आहे. पण त्यांनी घाबरण्याचे अजिबात कारण नाही. नोटीस आली तर चोख उत्तर द्या,’ असा सल्लाही आठवले यांनी दिला. ‘ईडी हा विभाग चौकशी करण्यासाठीच आहे. ईडीला ज्यांचे पेपर मिळतात, त्या पेपरच्या आधारे चौकशी होत असते. एखाद्या नेत्याला त्रास देण्याची भूमिका आमची अजिबात नाही. भाजपवर आरोप होत असला तरी ईडी यंत्रणा स्वतंत्र आहे,’ असेही आठवले यांनी स्पष्ट केले.