आता 'या' उड्डाणपूलाच्या नामकरणावरून वाद; शिवसेना-भाजप आमनेसामने - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 14, 2021

आता 'या' उड्डाणपूलाच्या नामकरणावरून वाद; शिवसेना-भाजप आमनेसामने

https://ift.tt/3iEu3NC
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलाच्या नामकरणावरून आणि शिवसेनेत वाद सुरू झाला आहे. भाजपने या पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची सूचना पालिकेला केली असून शिवसेनेने सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन सुफी चिश्ती-अजमेरी यांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे या नामकरणाचा वाद आता पेटण्याची शक्यता आहे. घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील पूर्व मुक्त मार्गाजवळून सुरू होणाऱ्या उड्डाणपूलाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे करण्याची मागणी भाजपचे खासदार यांनी पालिकेच्या स्थापत्य समितीकडे नऊ डिसेंबर २०२० रोजी केली. तर शिवसेनेचे खासदार यांनी या उड्डाणपुलाला सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन सुफी चिश्ती- अजमेरी यांचे नाव देण्याची मागणी १० जून रोजी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे भाजपने हा प्रश्न उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ज्यांनी राजकारण केले, त्या शिवसेनेला हिंदुत्वाप्रमाणे आता शिवरायांच्या नावाचे वावडे आहे काय, असा सवाल कोटक यांनी केला आहे. मुस्लिम संतांचे नाव स्थानिक जनतेच्या सहमतीने इतर कोणत्याही विकासकामास देण्याला भाजपचा विरोध नाही. मात्र उड्डाणपुलाच्या नामकरणावरून शिवसेनेकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप कोटक यांनी केला आहे. यासंदर्भात शेवाळे यांच्याकडे विचारणा केली असता स्थानिक जनतेच्या मागणीनुसार आपण संत मोईनुद्दीन चिश्ती यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून त्यांच्या नावाला मी विरोध केलेला नाही. याबाबत राज्य सरकारला जो निर्णय घेणे योग्य वाटेल तो आपणास मान्य असेल, असे शेवाळे यांनी सांगितले. 'पत्र मुख्यमंत्र्यांना का?' उड्डाणपूल पालिकेचा तर नामकरणाबाबत महापालिकेला पत्र न देता मुख्यमंत्र्यांना का, असा सवाल भाजपचे प्रवक्ता नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे. या उड्डाणपुलाला 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचे नाव दिले जात नाही, तोपर्यंत भाजप पालिका सभागृहात स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू, असा इशारा भालचंद्र शिरसाट यांनी दिला.