काँग्रेसजनांचे ऐकण्याची वेळ, ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनीच टोचले कान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 11, 2021

काँग्रेसजनांचे ऐकण्याची वेळ, ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनीच टोचले कान

https://ift.tt/3wkvO6U
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेले यांना भाजपचा 'प्रसाद' मिळणार काय, अशी खोचक टीका करून काँग्रेसमध्ये आता सुधारणांची गरज असून, शीर्षस्थ नेतृत्वाला काँग्रेसजनांचे ऐकण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ यांनी गुरुवारी म्हटले आहे. काँग्रेसच्या दयनीय अवस्थेविषयी अध्यक्ष यांना पत्र लिहणाऱ्या २३ प्रमुख नेत्यांमध्ये सिब्बल यांचाही समावेश आहे. या २३ नेत्यांमध्ये जितीन प्रसादही सामील झाले होते. पण, भाजपमध्ये दाखल होण्याच्या त्यांच्या निर्णयावर सिब्बल यांनी नापसंती व्यक्त केली आहे. 'जितीन यांना भाजपचा प्रसाद मिळेल की केवळ उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपुरता त्यांचा वापर होणार आहे,' असा सवाल त्यांनी केला. 'विचारधारा महत्त्वाची नसेल तर असे पक्षबदल सहजतेने होतात,' अशी टीका त्यांनी केली. 'आता तुमची उपयुक्तता नाही असे सांगून काँग्रेसच्या नेतृत्वाने आपल्याला कधी पक्ष सोडायला सांगितले तर पुढे काय करायचे याचा आपण निर्णय घेऊ. पण, भाजपमध्ये जाण्याचा कधी विचारही करणार नाही. आपल्या मृत्यूनंतरच ते शक्य होईल,' असे सिबल यांनी म्हटले आहे. काँग्रेसमध्ये असेपर्यंत आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहोत. आमचे २२ सहकारी काँग्रेसला मजबूत करण्याचे मुद्दे उपस्थित करीत राहतील, असे सिब्बल म्हणाले. मग शिवसेनेशी युती कशी? : जितीन प्रसाद 'ते (कपिल सिब्बल) खूप ज्येष्ठ नेते आहेत. तेथे कोणतीही विचारसरणी नाही. शिवसेनेशी युती करताना कोणती विचारसरणी होती? पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांबरोबर युती करताना विचारसरणीचे काय झाले? त्याचवेळी काँग्रेस केरळमध्ये डाव्यांच्या विरोधात लढत होती,' असे प्रत्युत्तर भाजपचे नेते जितीन प्रसाद यांनी सिबल यांना दिले आहे. 'माझ्यासारख्या लहान व्यक्तींवर बोलण्याने काँग्रेसचे भविष्य बदलणार नाही,' असाही टोला त्यांनी लगावला. काँग्रेसला मोठ्या शस्त्रक्रियेची गरज : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विश्वासू मित्र आणि उत्तर प्रदेशातील पक्षाचे तरुण नेते जितीन प्रसाद यांच्या भाजपप्रवेशावर ज्येष्ठ काँग्रेस नेते एम. वीरप्पा मोईली यांनीही पक्षाला खडे बोल सुनावले आहेत. 'काँग्रेसला मोठ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असून, पक्षाने केवळ वारशावर अवलंबून राहू नये,' असे सुनावतानाच मोईली म्हणाले की, नेत्यांना बळ देताना सर्वोच्च नेतृत्वाने वैचारिक बांधिलकीला प्राधान्य दिलेच पाहिजे. पंजाबसाठी शिफारस पंजाबमध्ये काँग्रेस पक्षांतर्गत गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या तीन सदस्यीय समितीने आपला अहवाल पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना गुरुवारी सादर केला. पक्ष संघटनेची फेरबांधणी करताना सर्व गटतट, जाती आणि प्रदेशांना सामावून घेण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये काँग्रेसचे पंजाब राज्यासाठीचे कार्यकारी सरचिटणीस हरीश रावत आणि खासदार जे. पी. अग्रवाल यांचा समावेश होता. राज्यात पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या समितीने राज्यातील अनेक नेत्यांशी चर्चा केली. या समितीने वरिष्ठ पदांसाठी कोणतेही मोठे बदल करण्याची शिफारस केलेली नाही, मात्र, फेरबांधणी करताना नवज्योतसिंग सिद्धू यांना योग्यरित्या सामावून घेतले जावे, असे या समितीने म्हटले आहे. सूत्रांच्या मते, सिद्धू यांची पंजाबच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. निर्णय सोनिया गांधी याच घेण्याची शक्यता आहे.