'जम्मू-काश्मीरच्या भल्यासाठी सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 25, 2021

'जम्मू-काश्मीरच्या भल्यासाठी सरकारने पाकिस्तानशी चर्चा करावी'

https://ift.tt/2SppnR3
नवी दिल्लीः पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती ( ) यांनी पुन्हा पाकिस्तानसोबत चर्चा सुरू करण्याची मागणी केली आहे. भारत सरकार चीनशी चर्चा करत असेल तर जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या भल्यासाठी पाकिस्तानशीही चर्चा केली पाहिजे. जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू करण्याची अत्यंत ( ) गरज आहे. हजारो नागरिकांचा रोजगार ठप्प आहे. याशिवाय राज्यात जी धरपकड आणि सक्तीचे वातावरण आहे तेही सुधारले पाहिजे, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा दोन वर्षांपूर्वी हिसकावण्यात आला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाने जनता नाराज आहे आणि आपली फसवणूक झाल्याचा राग त्यांच्या मनात आहे. केंद्र सरकार अवैधरित्या कलम ३७० हटवले. याविरोधात आमचे आंदोलन शांततेत सुरूच राहील. कलम ३७० ही आमची ओळख आहे. ही ओळख आम्हाला पाकिस्तानकडून नाही तर भारताकडून मिळाली होती. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांनी स्वतःहून आम्हाला हा दर्जा दिला होता, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. आम्हाला पुन्हा संपूर्ण राज्याचा दर्जा द्याः उमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे कलम ३७० हटवण्यापूर्वी केंद्र सरकारने राज्यातील नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. सर्वांची मतं आणि भूमिका जाणून घेतल्यानंतर निर्णय घ्यायला हवा होता. कलम ३७० हटवण्याचा निर्णय स्वीकारला जाणार नाही. पण याविरोधात कायदा आपल्या हातात घेणार नाही. आम्ही पंतप्रधान मोदींसमोर मोकळेपणाने आपली भूमिका मांडली. आधी सारखाच संपूर्ण राज्याचा दर्जा मिळावी अशी जम्मू-काश्मीरच्या जनतेची मागणी आहे, असं उमर अब्दुल्ला म्हणाले.