उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात किती कट्टर शिवसैनिक आहेत?: दरेकर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 16, 2021

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात किती कट्टर शिवसैनिक आहेत?: दरेकर

https://ift.tt/3p6cgCh
मुंबई: महाराष्ट्राच्या जनतेसाठी राज्य सरकारचे दोन वर्षांतील योगदान व सरकारची पुढील दिशा काय असेल याची माहिती राज्याच्या कोट्यवधी जनतेला मुख्यमंत्री यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणातून मिळेल, अशी अपेक्षा होती, परंतु मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईत काय कामं झाली, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्यक्षात मुंबईच्या विकासाची काय स्थिती आहे, हे मुंबईकरांना चांगलेच माहीत आहे. या भाषणामध्ये व विषयीचा टोकाचा तीरस्कार वारंवार व्यक्त होताना दिसत होता, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते यांनी केली. ( ) वाचा: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. दरेकर म्हणाले की, हिंदुत्व व मराठीविषयीची भूमिका पुन्हा अधोरेखित करण्याचा उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केला. त्यांना पुन्हा हिंदुत्वाचा विषय उपस्थित करावा लागला, हे सुद्धा उल्लेखनीय आहे. कारण हिंदुत्वाच्या विरोधात सातत्याने गरळ ओकणाऱ्यांच्या बाजूला केवळ सत्तेसाठी मांडीला मांडी लावून, आचार विचार बाजूला सोडून शिवसेना सत्ता उपभोगत आहे आणि भाजापावर सत्तेसाठी वाटेल ते आरोप करत आहे. भाजप सत्तापिपासू अशी टीका करणे नेमक्या शिवसेनेच्या कोणत्या संस्कृतीत बसते, असा सवालही दरेकर यांनी केला. वाचा: शिवसेना व भाजप हे दोन पक्ष २५ वर्षे एकत्र होते. त्यामुळेच शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीमध्ये यश मिळाले आहे. मागील विधानसभा निवडणुकीतही राज्यातील जनतेने भाजपाला सर्वाधिक जनाधार दिला. सर्वात जास्त जागाही जिंकून दिल्या. तसेच आजही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही भाजपाला सर्वाधिक यश मिळाले आहे व सर्वात मोठा पक्ष भाजपाच ठरला असल्याचे दरेकर यांनी निर्दशनास आणून दिले. पंढरपूरच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार समाधान अवताडे व देगलूरच्या निवडणुकीतील भाजप उमेदवार सुभाष साबणे हे उपरे आहेत, असे म्हणत असाल तर तुमच्या मंत्रिमंडळात किती कट्टर शिवसैनिक आहेत? शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळचे किती निष्ठावान शिवसैनिक तुमच्या मंत्रिमंडळात आहेत, याचे उत्तरही शिवसेनेने द्यावे. सध्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंकरराव गडाख तर खासदार ही मंडळी तर उपरीच आहेत ना?, असा सवालही दरेकर यांनी केला. वाचा: