
जळगाव : खासदार () आणि त्यांचे पती यांनी जळगाव शहरातील महाराणा प्रताप गणेश मंडळात हनुमान चालिसा पठण केले. यावेळी हनुमानाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना () त्यांची जागा दाखवली, आता त्यांच्या घरात उभं राहायला सुद्धा कार्यकर्ता उरला नाही, अशा शब्दात नवनीत राणांनी हल्लाबोल चढवला. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, तुम्ही असाल, तर मी पण नवनीत राणा आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, आमना सामना तर लवकरच होईलच व त्यात कळेल की कोण किती मजबूत आहे, अशा शब्दात नवनीत राणांनी ठाकरेंना ललकारलं आहे. नवनीत राणा काय म्हणाल्या? उद्धव ठाकरेंनी पॉवरचा दुरुपयोग केला, त्यांनी म्हटलं जेलमधून निघाल्यावर महिला तुटून जाईल, तिला काही बोलता येणार नाही, ती आमच्याविषयी काही बोलणार नाही, पण ज्या दिवशी जेलमधून बाहेर पडले, तेव्हा डबल ताकद. चौदा दिवस, बारा-बारा तास जेलमध्ये मी हनुमान चालिसेचं पठण केलंय, उद्धव ठाकरेला प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट... हनुमान चालिसेमध्ये मी पाठ करत होते, जर माझ्या भक्तीत थोडीही ताकद असेल, तर हनुमंत राय त्यांना जागा दाखवेल, आणि उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, आता त्यांच्या घरात उभं राहायला सुद्धा कार्यकर्ता उरला नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या. मै महिला हू, कमजोर नही हू, लढ सकती हू, आगे भी लढूंगी, मै भी मुंबई की लडकी हू और विदर्भ की बहू हू, इतनी कमजोर नही, अगर तू शिवसेना वाला है, अगर तू ठाकरे है, उद्धव ठाकरे है, तो मै भी राणा हू, विदर्भ की बहू समझ कर, तुम्हारे मे कितनी ताकद और मुझ मे कितनी ताकद, अभी आमना सामना तो हो ही जायेगा, असंही राणा म्हणाल्या. हेही वाचा : हो आम्ही मोदीजींचे भक्त - नवनीत राणा आम्ही मोदींचे भक्त आहोत, आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असं सांगत नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमनं उधळल्याचं पहायला मिळालं. सर्व जण आपल्या कुटुंबासाठी करतात, मात्र मोदींजींना कुटुंब नाही, संपूर्ण भारत देश त्यांचं कुटुंब आहे, देशातील सर्व जनतेची ते सेवा करत असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. म्हणून आम्ही मोदींचे भक्त असल्याचे नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं. विरोधकांना कुठलंही काम उरलं नाही, त्यांना आधीही काम नव्हतं, आता अमित शाह मुंबईमध्ये आलेले आहेत, त्यामुळे मुंबईचं काही ना काही तरी चांगलं होईल, असेही नवनीत राणा म्हणाल्या. मुंबई महापालिकेत यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या पिढीचं भलं केलं असं म्हणत नवनीत राणा यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी लोकांच्या हिताचं सरकार मुंबई महापालिकेत आलं पाहिजे, आणि त्यासाठी जोमाने लढणार असल्याचेही राणा म्हणाल्या. जे दोन पिढ्यांपासून मुंबईला खाण्याचं काम करताहेत, त्या उद्धव ठाकरेंचा यावेळी सर्वनाश होणार असंही यावेळी नवनीत राणा म्हणाल्या. हेही वाचा :