Monsoon 2023 : ककणल रड अलरट तर रजयत पऊस कस असल? मनसनबबत अपडट परणय रखडलय करण... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 8, 2023

Monsoon 2023 : ककणल रड अलरट तर रजयत पऊस कस असल? मनसनबबत अपडट परणय रखडलय करण...

https://ift.tt/T9crCxV
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : कोकण विभागामध्ये एकीकडे ‘रेड अॅलर्ट’ देण्याइतक्या पाऊस असताना राज्यात मात्र अजूनही पेरणीसाठी पुरेशा पावसाचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. येत्या चार आठवड्यांच्या पूर्वानुमानुसार कोकण विभाग वगळता इतर विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज आहे. राज्यामध्ये जुलैमध्ये सरासरीइतका पाऊस पडण्याची माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कमी काळात पडलेला जास्त पाऊस किंवा राज्याच्या एका विभागात पडलेला अतिरिक्त पाऊस उर्वरित राज्याची पावसाची सरासरी भरून काढण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.राज्यामध्ये सध्या ३० टक्के पावसाची तूट आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पावसाची नोंद आहे. तर मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, नाशिक, नंदुरबार, लातूर, भंडारा, गोंदिया येथे पाऊस सरासरीच्या श्रेणीत आहे. राज्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सांगली, हिंगोली, जालना, अकोला येथे पावसाची तीव्र तूट आहे. कोकणामध्ये आता सातत्यपूर्ण पाऊस असल्याने कोकणातील पावसाची तूट भरून यायला मदत होत आहे. सिंधुदुर्गातील पावसाची तूटही आता सरासरीच्या श्रेणीत आली आहे.भारतीय हवामान विभागाने गुरुवारी ६ जुलैला जारी केलेल्या पुढील चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार ७ ते १३ जुलै, १४ जुलै ते २० जुलै, २१ जुलै ते २७ जुलै या काळात कोकणामध्ये चांगला पाऊस असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ७ ते १३ जुलै या आठवड्यात मध्य महाराष्ट्रामध्ये तसेच विदर्भात काही ठिकाणी पाऊस अनुभवता येईल. मात्र १४ ते २० जुलै या कालावधीत बहुतांश महाराष्ट्रात फारसा पाऊस नसेल असे आत्ताच्या पूर्वानुमानावरून स्पष्ट होत आहे. २१ ते २७ जुलैच्या आठवड्यात मात्र पूर्ण राज्यात पावसाचे अस्तित्व असू शकेल. त्यानंतर २८ जुलै ते ३ ऑगस्ट या आठवड्यात पुन्हा पावसाचे प्रमाण खालावण्याची शक्यता आहे. या काळात कोकणात पाऊस पडू शकेल.

पेरण्या रखडल्या

सर्वसाधारणपणे शेतकरी १५ जुलैपर्यंत पेरण्यांची कामे संपवतात. मात्र पुरेसा पाऊस नसल्याने अजूनही पेरण्या रखडल्या आहेत. २० जुलैपर्यंत उर्वरित राज्यात फारसा पाऊस नसल्याने पेरण्यांची चिंता निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.