
राज्यात जोरदार पाऊस झाला. मॉन्सूनच्या पाऊस धुव्वाधार झाला. यंदा राज्यात मॉन्सून उशीराने दाखल झाला. पण अनेक भागात अतिमुसळधार पाऊस झाला. राज्यात आता पावसाचा जोर कमी झाला असला तरीही पावसाची उघछाप सुरू आहे. आजही अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला. पावसाला पोषख वातावरण असून विजांच्या कडकाडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भात पावसाला पोषक वातावरण असून विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत राज्यात पावसाचा जोर कमी झाला. पण पुढच्या आठवड्यापासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशात मॉन्सून सक्रिय झाला. अनेक राज्यात पाऊस कोसळत आहे. एल निनोमुळे देशात यंदा मॉन्सूनचा पाऊस होणार नसून दुष्काळ पडण्याचा अंदाज होता. पण देशात जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे.
दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राज्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली. इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या दारणा धरणात 53.67 टक्के, मुकणे धरणात 34.63 टक्के, भावली धरणात 89 टक्के, भाम धरणात 50 टक्के, वाकी धरणात 23 टक्के, वालदेवी धरणात 72 टक्के आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे.
धरणांतील वाढलेला पाणीसाठा दिलासादायक असला तरी गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठ्यातील वाढीचा वेग मंदावला आहे. आगामी काळात होणाऱ्या पावसावर धरणांतील पाणीसाठ्याची पुढील स्थिती अवलंबून राहणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात आठ दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसाने मागील 24 तासांपासून विश्रांती घेतली आहे.
काल दिवसभर शहरातील आकाश निरभ्र होते. अजूनही चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. इगतपुरी नगर परिषद हद्दीतील गिरणारे गावात भर पावसातही पाण्याची टंचाई. आधीच आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा होतो त्यातही 20 ते तीस मिनिटे येते नळाला पाणी. त्यातही पाण्याची वेळ नाही. संतापलेल्या महिला उतरल्या रस्त्यावर. आज पावसाचा इशारा विदर्भात देण्यात आला. बाकी भागात हवामान पाऊस काही प्रमाणात कोसळेल.