'...वो लोग कमाल करते है'; राऊतांचं नवं ट्विट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 6, 2019

'...वो लोग कमाल करते है'; राऊतांचं नवं ट्विट

https://ift.tt/2WMDgX9
मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरुन आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बुधवारी आणखी एक सूचक ट्विट केले आहे. 'जो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है', असा संदेश असलेलं ट्विट राऊत यांनी केलं आहे. आता राऊत यांना या ट्विटमधून नेमकं काय सूचित करायचं आहे याची चर्चा सुरू झाली आहे. वाचा: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १३ दिवस उलटून गेले तरी अद्याप सत्ता स्थापनेची चिन्ह दिसत नाहीत. त्यात शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्त्वाखाली भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार स्थापन होईल, असं स्पष्ट करत भाजपची भूमिका मांडली. यासोबतच शिवसेनेसोबत चर्चेचे सर्व दरवाजे खुले असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. पाटील यांच्या विधानावर राऊत यांनी आम्ही वेगळा प्रस्ताव देणार नाही, जे याआधी ठरलंय ते लेखी स्वरुपात भाजपने द्यावं, त्यानंतरच चर्चा होईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं. वाचा: मंगळवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन जवळपास दीडतास चर्चा केली. त्यानंतर ते थेट मुंबईला निघाले. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी आज सकाळी केलेल्या ट्विटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदाबाबत ठाम असल्याचं राऊत यांनी ठणकावून सांगितल्याने सत्तेची कोंडी कायम आहे.