मराठवाड्यात ४० वर्षांनी वाघोबा दर्शन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 2, 2019

मराठवाड्यात ४० वर्षांनी वाघोबा दर्शन

https://ift.tt/2JCE0ZN
औरंगाबाद : गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच मराठवाडा विभागात वाघाचं दर्शन झालं आहे. हिंगोली जिल्ह्यात तरुण वाघ दिसून आल्याचं वन विभागाने सांगितलं आहे. या वाघाने मोठा प्रदेश ओलांडत गेल्या पाच महिन्यात २०० कि.मी. पेक्षा जास्त अंतर कापलं असून पैनगंगा अभयारण्यही ओलांडलं आहे. या वाघाचं नाव सी१ असून तो तीन वर्षांचा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील टिपेश्वर अभयारण्यातून हा तीन वर्षांचा वाघ मराठवाड्यात आला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या नोंदीनुसार, वाघाचा हा सर्वात मोठा पाचवा संचार आहे. सी१ अजूनही पुढील वाटचाल करत आहे. त्यामुळे सी१ कडून नवा विक्रम रचला जाऊ शकतो. वाघ नवीन प्रदेश शोधण्यासाठी किंवा नव्या साथीदाराला भेटण्यासाठी भटकंती करत असतात. वाचा : वन विभागाकडून सी१ वाघावर फेब्रुवारी २०१९ पासून सातत्याने नजर ठेवली जात आहे. ऑक्टोबर १९ ते ३० या काळात हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विभागातील उमरखेड वनक्षेत्रात होता. ३० ऑक्टोबर रोजी हा वाघ यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या इसापूर अभयारण्यात कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. गुरुवारी सी१ ने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला. वाचा : हिंगोली जिल्हा वनअधिकारी केशव वाबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या वाघाने आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील दोन गावातील चार गायींची शिकार केली असून तो आता काळगावमध्ये वास्तव्याला आहे. हिंगोलीतील लिंडे गावात ३० ऑक्टोबरला पहिल्या गायीची शिकार करण्यात आली.” “यानंतर वाघाने काळगावाजवळच तीन गायींची शिकार केली. पण वाघाने शिकार केली असेल असा संशयही कुणाला आला नाही. पण नंतर गावाच्या जवळ कॅमेरे लावण्यात आले. या कॅमेऱ्यामुळे या भागात वाघाचं वास्तव्य असल्याचं निदर्शनास आलं,” असंही केशव वाबळे म्हणाले. औरंगाबाद वनविभागाचे मुख्य संवर्धक अधिकारी पी. के. महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अधिकृत नोंदींनुसार १९७२ ला औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा अभयारण्यात वाघाची शिकार करण्यात आली होती. त्यानंतर एकही वाघ या विभागात दिसला नाही.” वाचा : पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि टिपेश्वर अभयारण्यातील सी१ चे निरीक्षक रवीकिरण गोवेकर यांच्या मते, “हिंगोलीत प्रवेश करण्यापूर्वी या वाघाने तेलंगणातील आदिलाबाद, पांढरकवडा, किनवट, नांदेड, पैनगंगा अभयारण्य, पुसद आणि इसापूर अभयारण्य या विभागात मोठ्या प्रमाणात संचार केला.” दरम्यान, सी१ वाघाच्या उपस्थितीमुळे गावकरी भयभीत झाले असून वनविभागाकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. गावकऱ्यांनी उघड्यावर झोपू नये आणि योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन वनविभागाने केलं. गावकऱ्यांच्या दबावाला बळी पडून वनविभागाने कोणतंही पाऊल उचलू नये, गावकऱ्यांना विश्वासात घ्यावं, अशी मागणी प्राणीप्रेमींनी केली.