नाराजीची चर्चा संजय राऊत यांनी फेटाळली! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 30, 2019

नाराजीची चर्चा संजय राऊत यांनी फेटाळली!

https://ift.tt/2QIDbS3
मुंबई: धाकटे बंधू आमदार यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असल्याची चर्चा शिवसेनेचे नेते, खासदार यांनी फेटाळून लावली आहे. 'आम्ही पक्षासाठी काम करतो. पदासाठी नाही. त्यामुळं नाराज असण्याचा प्रश्नच नाही,' असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांचा मोलाचा वाटा होता. सरकार स्थापनेच्या संपूर्ण प्रक्रियेत ते सातत्यानं आघाडीवर होते. शरद पवारांशी त्यांची असलेली जवळीक सरकार स्थापनेमध्ये महत्त्वाची ठरली असल्याचंही बोललं जातं. त्यामुळं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. मात्र, शिवसेनेनं तीन अपक्षांना संधी दिल्यानं सुनील राऊत यांचं नाव मागे पडलं आहे. त्यावरून संजय राऊत नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र, वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांनी हे वृत्त फेटाळलं.

वाचा:

'सरकार स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली यातच समाधान आहे. कुठल्याही पदासाठी नाराज असण्याचं काहीही कारण नाही,' असं त्यांनी म्हटलं आहे. तो दिलदारीचा प्रश्न आहे! विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. 'शपथविधीवर बहिष्कार टाकण्याची प्रथा, परंपरा किंवा संकेत नाही. तो दिलदारीचा प्रश्न असतो. त्यामुळं कुणी बहिष्कार टाकत असेल तर ते चुकीचं आहे,' असं ते म्हणाले. वाचा: सुनील राऊत यांना म्हाडाचं अध्यक्षपद सुनील राऊत यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नसली तरी त्यांना म्हाडाचं अध्यक्षपद मिळू शकतं, अशी चर्चा आहे. मात्र, म्हाडाच्या अध्यक्षपदापेक्षा मंत्रिमंडळात संधी मिळाली असती तर अधिक चांगलं झालं असतं, अशी एक भावना राऊत कुटुंबीयांमध्ये असल्याचं बोललं जातं. अर्थात, याबाबत राऊत यांनी कुठलंही भाष्य करण्याचं टाळलं आहे. वाचा: