हैदराबाद एन्काउंटर: निष्पक्ष चौकशी गरजेची-सुप्रीम कोर्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 12, 2019

हैदराबाद एन्काउंटर: निष्पक्ष चौकशी गरजेची-सुप्रीम कोर्ट

https://ift.tt/38wLFUn
नवी दिल्ली: प्रकरणी आज, गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सत्य जाणून घेण्याचा अधिकार लोकांना आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्याची आवश्यकता आहे, असं सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी स्पष्टपणे नमूद केलं. तुम्हाला पोलिसांविरोधात गुन्हेगारी खटला चालवायचा असेल, तर आम्ही कोणताही आदेश देणार नाही, असंही त्यांनी राज्य पोलीस विभागाला सांगितलं. हैदराबादमधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशात संताप व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी काही दिवसांनी पोलीस एन्काउंटरमध्ये मारले गेले. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात येत आहे. तेलंगण सरकारच्या बाजूने मुकुल रोहतगी हे सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करत आहेत. लोकांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, असं सरन्यायाधीश बोबडे यांनी पोलीस विभागाला सांगितलं. आरोपी सराईत गुन्हेगार होते का? अशी विचारणा सरन्यायाधीशांनी तेलंगणा पोलिसांना केली. त्यावर आरोपी हे ट्रकचालक आणि क्लीनर होते. घटनास्थळी आरोपींना घेऊन जात असताना, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन झाले. त्यामुळं त्यांना रात्री घटनास्थळी घेऊन गेले. आरोपींना बेड्या घातल्या नव्हत्या. त्यांनी पोलिसांकडील बंदूक हिसकावली. पोलिसांवर दगडफेक केली, अशी माहिती पोलिसांच्या वतीनं रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात दिली. पोलिसांनी गोळी लागली का? चारही आरोपींनी पोलिसांवर आधी हल्ला केला का, अशी विचारणाही कोर्टानं पोलिसांना केली. आरोपींनी पोलिसांकडील बंदूक हिसकावली का? त्यातून पोलिसांवर गोळीबार केला का? असे प्रश्नही विचारले. त्यावर आरोपींनी गोळीबार केला, मात्र पोलिसांना गोळी लागली नाही, असं रोहतगी यांनी सांगितलं. तीन सदस्यीय आयोग करणार चौकशी हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं तीन सदस्यीय आयोगाची स्थापना केली. ही चौकशी सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर हे या आयोगाचे अध्यक्ष असतील.