हिंसा करू नका; आंदोलकांना अक्षयचे आवाहन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 28, 2019

हिंसा करू नका; आंदोलकांना अक्षयचे आवाहन

https://ift.tt/363JRR7
मुंबईः सुधारित नागरिकत्व कायद्यावरून देशभरात वातावरण ढवळून निघाले आहे. देशातील अनेक भागांत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत. इतकंच नव्हे तर अनेक बॉलिवूड कलाकरांनीही आणि एनआरसीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता अक्षय कुमारनंही याविषयावर मत मांडले आहे. हिंसा करणं हे माझ्या स्वभावात नाही त्यामुळं मी इतकंच सांगेन हिंसा करू नका, असं मत अक्षय कुमारनं मांडले आहे. 'गुड न्युज' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या कार्यक्रमादरम्यान अक्षय कुमारला 'समाजात होत असणाऱ्या विरोध आणि निदर्शनांचा बॉलिवूडवर कसा परिणाम होत आहे?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अक्षयनं सावधपणे आपली भूमिका मांडली आहे. 'मला हिंसाचार आवडत नाही, मग तो कोणत्याही पक्षाकडून होत असेल, हिंसा करू नका. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करु नका. तुम्हाला जे काही सांगायचे असेल ते एकमेकांसमोर बसून सांगा.' असं अवाहन त्यानं केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध ठिकठिकाणी हिंसक आंदोलनं होत आहेत तर दुसरीकडे या कायद्याच्या समर्थनासाठीही लोक रस्त्यावर उतरत आहेत. जामिया मिलीया इस्लामिया आणि एएमयूच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार घडला होता. यानंतर स्वरा भास्कर, सुशांत सिंह, ऋचा चड्ढा, फरहान अख्तर यासारखे अनेक बडे कलाकार विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढे आले होते.