मुंबई: देशाचे तुकडे पाडण्यासंदर्भात घोषणाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात प्रतिघोषणा बाजी करण्याऐवजी 'तुकडे तुकडे गँग'च्या कानाखाली अखंड हिंदुस्थानच्या नकाशाचा जाळ उठवला पाहिजे, असे म्हणत शिवसेनेने ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने आदेश दिल्यास आम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसू असे वक्तव्य लष्करप्रमुक नरवणे यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून मागणी केली आहे. 'देशाच्या संसदेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आदेश लष्करप्रमुखांनी मागितला आहे. केंद्र सरकारने आता माघार घेऊ नये. ‘तुकडे तुकडे गँग’ला धडा शिकवण्याचा हाच उत्तम मार्ग आहे, असल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे. सर्जिकल स्ट्राईकचा बार उडवल्यावर प्रत्येक निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान मोदी व भाजपचे सगळेच नेते बुलंद आवाजात सांगत होते, ‘‘देशवासीयांनो, आता पुढचे लक्ष्य पाकव्याप्त कश्मीर आहे बरं का! पाकने घशात घातलेले कश्मीर सोडवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करू!’’ जनरल नरवणे सरकारच्या त्याच भूमिकेची ‘री’ ओढत असल्याचेही आठवण शिवसेनेने करून दिली आहे.
अखंड हिंदुस्थान हे तर वीर सावरकरांचे मोठे स्वप्नच होते. त्यामुळे सावरकरांचादेखील सन्मान होईल. दुसरे असे की, भाजपचे केंद्र सरकार हिमतीचे व हिकमतीचे आहे हे सिद्ध होईल अशी टोला लगावत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ‘तुकडे-तुकडे गँग’वर त्यांचा रोष आहे. देशाचे तुकडे पाडण्यासंदर्भात घोषणाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात प्रति घोषणाबाजी करण्यापेक्षा ‘तुकडे-तुकडे’ गँगच्या कानाखाली अखंड हिंदुस्थानच्या नकाशाचा जाळ उठवला पाहिजे व त्यालाच आम्ही देशभक्ती म्हणत असल्याचे सामनाने म्हटले आहे. नैतिकता, नियम व संकेत पाळणे हे लष्कराचे कर्तव्यच आहे. पाकिस्तानी लष्कराप्रमाणे घुसखोरी करणे हा आपल्या लष्कराचा पुरुषार्थ नसल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. देशाच्या संसदेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आदेश लष्करप्रमुखांनी मागितला आहे. केंद्र सरकारने आता माघार घेऊ नये. ‘तुकडे तुकडे गँग’ला धडा शिकवण्याचा हाच उत्तम मार्ग असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.