भारतातील सध्याची स्थिती दु:खद : सत्या नडेला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 14, 2020

भारतातील सध्याची स्थिती दु:खद : सत्या नडेला

https://ift.tt/2tYv9wk
मॅनहॅटन: मायक्रोसॉफ्टचे सीईओ यांनी भारतातील सध्याच्या परिस्थितीबाबत भाष्य केले आहे. नडेला यांनी सुधारीत नागरिकत्व कायद्याबाबत नकारात्मक मत व्यक्त केले आहे. भारतीय वंशाचे असणारे सत्या नडेला यांनी मॅनहॅटन येथे संपादकांसोबत झालेल्या चर्चेत आपले मत व्यक्त केले आहे. त्यावेळी त्यांना भारतातील सुधारीत नागरिकत्व कायद्याबाबत मत विचारण्यात आले होते. त्यावेळी नडेला सांगितले की, भारतात सध्या जे होत आहे ते दु:खद आहे. भारतात येणाऱ्या बांगलादेशी शरणार्थींपैकी एखाद्याने यूनिकॉर्न बनवण्याचे किंवा इन्फोसिसचा पुढील सीईओ झालेले पाहणे आवडेल अले वक्तव्य केले आहे. सत्या नडेला यांनी सांगितले की, कोणत्याही देशाला आपल्या सुरक्षेबाबत चिंता करू नये असे मी म्हणत नाही. देशांमध्ये सीमा असतात आणि ही वास्तविकता आहे. स्थलांतर हा अमेरिकेचा प्रश्न आहे, युरोप आणि भारताचाही मुद्दा आहे. मात्र, स्थलांतर म्हणजे काय, शरणार्थी कोण आहे आणि अल्पसंख्याक समूह कोण आहे हे तुम्ही कोणत्या आणि कशाच्या आधारे ठरवता हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. नडेला यांनी आपले स्वत:चे उदाहरणदेखील दिले. आपण एका जागतिक कंपनीचे सीईओ आहोत. त्याचे श्रेय हे भारतातील तंत्रज्ञानाच्या प्रसाराला आणि अमेरिकेच्या इमिग्रेशन पॉलिसीला जात असल्याचे नडेला यांनी स्पष्ट केले. त्यांनी भारतातील सर्वसमावेशक संस्कृतीचाही उल्लेख केला. उदारमतवादी मूल्यांमुळे भांडवलशाहीला बळ मिळते. भारत सरकारलाही ही बाब ठाऊक असेल असेही त्यांनी म्हटले.