मृत्यूबद्दलच्या ऋषींच्या गोष्टी झाल्या खऱ्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 3, 2020

मृत्यूबद्दलच्या ऋषींच्या गोष्टी झाल्या खऱ्या

https://ift.tt/3bY9C8p
मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते यांचं ३० एप्रिल रोजी निधन झालं. जवळपास दोन वर्ष ते कर्करोगाशी लढत होते. ऋषी कपूर यांच्या निधनामुळे फक्त बॉलिवूडच नाही तर सिनेप्रेमींनाही दुःख अनावर झालं. सध्या सोशल मीडियावर ऋषी यांचे अनेक ट्वीट व्हायरल होत आहेत. यात त्यांनी आपल्या मृत्यूबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्या आता खऱ्या झाल्या. सलग केले अनेक ट्वीट- २०१७ मध्ये अभिनेते विनोद खन्ना यांच्या अंत्यसंस्काराला फार कमी लोक उपस्थित होते. याशिवाय नवीन पिढीतील एकाही कलाकाराने त्यांचं अंत्यदर्शन घेतलं नाही. याच गोष्टीचा ऋषी यांना प्रचंड राग आला होता. यानंतर त्यांनी परखड शब्दात नवीन पिढीची कान उघडणी केली होती. त्यांनी सलग ट्वीट करत आपला राग व्यक्त केला होता. ऋषी यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, 'लाजिरवाणं! फारच वाईट नवीन पिढीतील एकही अभिनेता विनोद खन्ना यांच्या अंत्यदर्शनाला गेला नाही. यातही विनोद यांच्यासोबत अनेकांनी काम केलं होतं. कमीत कमी मान ठेवायला शिकलंच पाहिजे.' ऋषी यांनी अजून एक ट्वीट केलं, 'असं का? जेव्हा मी मरेन, तेव्हा मला माझ्या मृत्यूसाठी तयार रहायला हवं. कोणी मला खांदा देणार नाही. नवीन पिढीतील कलाकारांवर मी नाराज आहे.' ऋषी कपूर यांनी अजून एका ट्वीटमध्ये लिहिले की, 'रागात आहे. काल प्रियांका चोप्राच्या पार्टीत अनेक लोक दिसले पण विनोद खन्ना यांच्या अंत्ययात्रेला फार कमी लोक होते. मी या सर्वांवर फार नाराज आहे.' लॉकडाउनमध्ये झालं ऋषी कपूर यांचं निधन देशात करोना व्हायरसमुळे लॉकडाउन आहे. या काळातच ऋषी यांचं निधन झालं. लॉकडाउनमुळेच कोणत्याही कलाकाराला त्यांच्या अंत्यसंस्काराला जाता आलं नाही. फक्त २० जणांना अंत्यसंस्कारात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. विनोद खन्ना यांच्या निधनावेळी ऋषी यांनी बोललेली प्रत्येक गोष्ट खरी झाली.