लॉकडाउनमुळे गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 3, 2020

लॉकडाउनमुळे गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ

https://ift.tt/2zLjUKC
नवी दिल्ली भारत देश खऱ्या अर्थाने ४० हजार खेड्यांमध्येच वसला आहे, त्यामुळे गावाकडेच चला, असं महात्मा गांधी म्हणायचे. अर्थात महात्मा गांधींच्या त्यामागचा उद्देश हा गाव-खेड्यांच्या विकासाच्या दृष्टीचा होता. पण सध्या देशातील करोनाच्या संकटामुळे लॉकडाउन करण्यात आलं आहे आणि शहरांमध्ये करोनाचं भय जास्त असल्यानं याकाळात गावातील लोकसंख्येत वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. ही वाढ ७ टक्के इतकी नोंदवली गेली आहे. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (सीपीआर) या संस्थेने केलेल्या अभ्यासात शहरातील लोकसंख्येत जवळपास ११ टक्क्यांची घट झाल्याचं समोर आलं आहे. तर गावातील लोकसंख्येत ७ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. लॉकडाउनमुळे लोकांचं गावाकडून शहरात होणार अप-डाउन बंद झालं आहे, असंही या अहवालात समोर आलं आहे. करोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे. त्यानंतर १७ मेपर्यंत लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याचीही घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे भारतातील लोकसंख्येवर काय परिणाम होतोय, याचाही अभ्यास केला जात आहे. यात अनेक मुद्दे निदर्शनास आले आहेत. 'लॉकडाउनमुळे लाखोंच्या संख्येनं गावाकडील लोक शहरात येणं आता बंद झालं आहे. यामुळे शहरानजिकच्या गावांमध्ये लोकसंख्येत वाढ झाली आहे. यात राजस्थानचा पश्चिम भाग, ओडिशा येथे सर्वाधिक स्थलांतरणाचं प्रमाण आढळून आलं आहे. प्रवासी मजुरांनी केलेलं पलायन हे यामागचं कारण असू शकतं', असं सीपीआर संस्थेचे वरीष्ठ अधिकारी पार्थ मुखोपाध्याय यांनी सांगितलं. आगामी काळात आणखी वेगळं चित्र! लक्षवेधी बाब अशी की जास्त लोकसंख्या असलेल्या आणि गरीब राज्य म्हणून पाहिल्या जाणाऱ्या बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्येत जास्त वाढ झालेली नाही. या राज्यांमधून मोठ्या संख्येने लोक इतर राज्यांमध्ये जात असतात. लॉकडाउमुळे रेल्वेसेवा बंद आहे. त्यासोबतच राज्यांच्याही सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमधील लाखोंच्या संख्येने लोक इतर राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. मजुरांसाठी रेल्वे सुरू करण्यासाठीची परवानगी देण्यात आल्याने येत्या काळात या आकडेवारी लक्षणीय बदल दिसू शकतो.