२० जवानांच्या हत्येचा बदला मोदी सरकार कसा घेणार? संजय राऊतांचा सवाल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 21, 2020

२० जवानांच्या हत्येचा बदला मोदी सरकार कसा घेणार? संजय राऊतांचा सवाल

https://ift.tt/37O9OWz
मुंबईः चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उठली आहे. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या सामनातील रोखठोक सदरातून पुन्हा भाजपला धारेवर धरलं आहे. परराष्ट्र व संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणाचे हे फलित आहे. अमेरिकेचे ट्रम्पही उद्या निवडणूक हरतील. मोदींच्या बाजूने आता कोण उभं राहील? चीनच्या आक्रमणानं बाहुबली राजकारणाची हवा निघाली, असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीमुळं भारत आणि चीनमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. दरम्यान, या घटनेवरून राजकारणही तापलं असून सरकारवर विरोधकांनी टीका करण्याची एकही संधी सोडली नाहीये. या संपूर्ण संघर्षावर भाष्य करणारा 'सर्वच सीमा अशांत, बाहुबली राजकारणाची हवा निघाली' हा लेख राऊत यांनी सामनाच्या रोखठोकच्या सदरात लिहला आहे. चीनने भारताचे २० सैनिक मारले. त्याचा बदला मोदी सरकार कसा घेणार, की बदला घेण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक करून विजयी डंका पिटवण्यासाठी पाकिस्तान हा राखीव ठेवला आहे? असा खरमरीत सवाल राऊत यांनी केला आहे. वाचाः संजय राऊत यांच्या लेखातील महत्त्वाचे मुद्दे बदला कसा घेणार? २० जवानांच्या हत्येचा बदला मोदी सरकारने घेतला नाही तर ही आपली सगळ्यात मोठी मानहानी ठरेल. १९६२चे चीनबरोबरचे युद्ध नेहरूंच्या धोरणांमुळं हरलो हा डंका आता भाजपला पिटता येणार नाही. आज चीनी सैनिकांच्या ताब्यात आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्तानं अधिकृतपणे जाहीर केलं की गलवान व्हॅली हा चीनचाच भूभाग आहे. यावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये. असं ते म्हणाले. वाचाः अमेरिकेसाठी शेजारी चीनसाठी भांडण का? भारताच्या सीमेवरील बहुतेक राष्ट्र आज चीनची मांडलिक आहेत. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका ही राष्ट्रे चीनची मदतीवर जिवंत आहेत. चीनच्या इशाऱ्यावर भारताला आव्हान देत आहेत. महासत्ता अमेरिकेशी मैत्रीवगैरे ठिक, पण सीमा अशांत राहिल्या तर महासत्ता काय करणार? अमेरिकेसाठी निकटच्या शेजारी असलेल्या चीनशी भांडण करणे ही परराष्ट्र व संरक्षणविषयक नीती असू शकत नाही. दुर्देवानं आज तेच घडताना दिसत आहे. असं ते म्हणाले. आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बाहुबली राजकारणाची हवा लडाख, गलवान व्हॅली प्रकरणात निघाली आहे. लडाख, गलवान व्हॅली चीनच्या जबड्यात गेली व आपण सुटकेचा मार्ग शोधत आहोत. आता ट्रम्पही निवडणूक हरतील अशी स्थिती आहे. ट्रम्पसाठी चीनला दुखवून काय साध्य केलं? गलवान व्हॅलीत आपण खाली खोल कोसळलो आहोत. त्यातून बाहेर पडावं लागेल. पंतप्रधान मोदींबरोबर देश उभाच आहे, पण ते देशाचे ऐकणार आहेत काय? असाही सवाल त्यांनी केलाय. वाचाः