सुशांतसिंहचे ट्विटस मिसिंग? मुंबई पोलीस करणार तपास - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 25, 2020

सुशांतसिंहचे ट्विटस मिसिंग? मुंबई पोलीस करणार तपास

https://ift.tt/3fT3MGT
मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न निर्माण झालेले असतानाच त्याचे काही ट्विटसही गायब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलीस आता त्याच्या या गायब ट्विटसचा शोध घेणार आहेत. तसेच सुशांतसिंहच्या आत्महत्येमागच्या प्रत्येक अँगलचाही शोध घेणार आहे. सुशांतसिंहने करण्यापूर्वी काही ट्विट डिलिट्स केल्याचं सांगण्यात येतं. त्या ट्विटसमध्ये त्याने नेमकं काय लिहिलं होतं? किंवा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? या ट्विट्समध्ये कुणावर आरोप तर केले नव्हते ना? किंवा या ट्विटसमधून आत्महत्येचे संकेत तर दिले नव्हते ना? या सर्व प्रश्नांचा शोध घेण्यासाठी पोलीस या ट्विटसचा तपास करणार आहे. त्यासाठी ट्विटर इंडियाशी पोलीस संपर्क साधणार आहेत. या डिलिट करण्यात आलेल्या ट्विटमधून कदाचित त्याच्या आत्महत्या प्रकरणावर प्रकाश पडू शकतो, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. सुशांतने २७ डिसेंबर २०१९ रोजी शेवटचं ट्विट केलं होतं. दरम्यान, ज्या संकेतस्थळांनी सुशांतसिंहच्या आत्महत्येमागची वेगवेगळी कारणं व्यक्त केली आहेत किंवा त्याच्या आत्महत्येची थेरी मांडली आहे, अशा संकेतस्थळांनाही नोटीस पाठवण्यात येऊ शकते, असं सांगितलं जातं. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २३ जणांची चौकशी केली आहे. काल त्याच्या चार्टड अकाऊंटचीही चौकशी करण्यात आली आहे. सुशांतचा पोस्टमार्टम अहवाल आला असून त्याच्या शरीरावर कोणत्याही खूणा नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याची नखेही साफ असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. सुशांतसिंहने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. बराचवेळ दरवाजा वाजवूनही त्याने दरवाजा न उघडल्याने त्याच्या नोकराने घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, त्याच्यावर मनोविकार तज्ज्ञाकडून उपचारही सुरू होते, असं सूत्रांनी सांगितलं. टीव्ही अभिनेता म्हणून करियरची सुरुवात करणाऱ्या सुशांतने मोठ्या संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. सुशांतने 'किस देश में है मेरा दिल' मालिकेत पहिल्यांदा काम केलं. मात्र त्याला खरी ओळख एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून मिळाली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 'काय पो छे' हा सुशांतचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील अभिनयाबद्दल त्याचं कौतुकही झालं होतं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नव्हतं. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवरील बायोपिकने त्याचे बॉलिवूडमधील स्थान अधिक पक्कं केलं होतं.