... म्हणून जयंत पाटील 'वेल डन महाराष्ट्र' म्हणाले! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 16, 2020

... म्हणून जयंत पाटील 'वेल डन महाराष्ट्र' म्हणाले!

https://ift.tt/30Mz3a0
मुंबई: राज्यात एकाच दिवशी करोनाचे ५ हजाराहून अधिक रुग्ण बरे झाल्याने जलसंपदा मंत्री यांनी महाराष्ट्रातील जनतेला सलाम केला आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमामुळे हे शक्य झाले... वेल डन महाराष्ट्र!..,अशा शब्दात जयंत पाटील यांनी ट्विट करून समाधान व्यक्त केले आहे. राज्यात करोनाने थैमान घातले असताना सोमवारी एक दिलासादायक आकडेवारी समोर आली. राज्यात एकाच दिवशी ५ हजार ७१ करोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरद्वारे समाधान व्यक्त करत याचे श्रेय राज्यातील जनतेला तसेच अहोरात्र झटणाऱ्या प्रशासनाला दिले आहे. पाटील यांनी सोमवारी रात्री उशिरा आरोग्य विभागाची अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध झाल्यावर ट्वीट केले. एकाच दिवशी ५ हजार ७१ करोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. ४ हजार २४२ रुग्ण मुंबई शहर व उपनगरातील आहेत. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. फक्त आणि फक्त राज्यातील जनतेच्या संयमामुळे, प्रशासनावरील विश्वासामुळे हे शक्य झाले आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्याने दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत करोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. करोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ४७.२ टक्के आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले. राज्यात ५० हजार रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू दरम्यान, काल राज्यात करोना संसर्गामुळे १७८ रुग्णांचा बळी घेतला असून राज्यात करोनामृत्यूंचा आकडा ४ हजार १२८ इतका झाला आहे. काल सर्वाधिक ६८ रुग्ण मुंबईत दगावले आहेत तर त्याखालोखाल वसई-विरार भागात २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे व धुळ्यातील आकडाही चिंताजनक आहे. पुण्यात १४ तर धुळ्यात आज १३ रुग्ण दगावले. आजच्या आकडेवारीतील २९ रुग्णांचा मृत्यू मागील दोन दिवसांतील आहे. त्यांची आज नोंद केली गेली. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ४१२८ रुग्णांना प्राणास मुकावे लागले आहे. दरम्यान, राज्यात आज २ हजार ७८६ नवीन रुग्णांची भर पडली तर ५०७१ रुग्णांना विविध रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता १ लाख १० हजार ७४४ वर पोहचली आहे. त्यातील ५० हजार ५५४ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत.