नवी दिल्ली : देश करोना संकटाशी झगडत असतानाच किनारपट्टीवरच्या राज्यांना चक्रीवादळाला तोंड द्यावं लागतंय. '' आता महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमन, दादरा नगर हवेलीला धडक देण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , गुजरातचे मुख्यमंत्री यांच्याशी फोनवरून चर्चा केलीय. सोबतच दीव-दमन आणि दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्याशीही पंतप्रधानांनी संपर्क साधला. अचानक उद्भवलेल्या या संकटाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार हरएक पद्धतीनं मदतीसाठी सरकारच्या पाठिशी उभं असल्याचं आश्वासन यावेळी पंतप्रधान मोदींनी दिलंय. पंतप्रधान कार्यालयाकडून एका ट्विटद्वारे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. 'बांगलादेश'नं नामकरण केलेलं 'निसर्ग' चक्रीवादळ आज दुपारी अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. ताशी १३ किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकतंय. हे चक्रीवादळ किनाऱ्याला धडकताना त्याचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटर असू शकेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. महाराष्ट्र, गुजरात तसंच दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमध्ये एनडीआरएफच्या एकूण ४० तुकड्या तैनात करण्यात आल्यात. मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी कोस्ट गार्डचे जहाजही तैनात करण्यात आलेत. लष्कराच्या बचाव आणि मदत दलासोबच, नौदलाची जहाजं आणि हवाईदलाचे विमानंही मदतीसाठी सज्ज आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रात एनडीआरएफच्या २० तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. एका तुकडीत ४५ जवानांचा समावेश आहे. महाराष्ट्राला करोनानं घातलेला विळखा दरम्यान, महाराष्ट्राला करोनानं घातलेला विळखा अजूनही सैल झालेला नाही. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांची संख्या ७२,३०० वर पोहचलीय. यात केवळ मुंबईमधील ४२,२१६ रुग्णांचा समावेश आहे. यातील ३१,३३३ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. तर एव्हाना २,४६५ जणांचा मृत्यू झालाय.