'चौकीदार, आता तरी राफेलची किंमत सांगा'; 'या' नेत्याची मोदींकडे मागणी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 29, 2020

'चौकीदार, आता तरी राफेलची किंमत सांगा'; 'या' नेत्याची मोदींकडे मागणी

https://ift.tt/2CVrgNy
नवी दिल्ली: शत्रूच्या काळजात धडकी भरवणारी ५ घातक लढाऊ विमाने ()आज भारतात येत आहेत. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकी राफेल हा मुद्दा गाजला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या विमानखरेदीच्या करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत () यांना घेरले होते. आज राफेल भारतात दाखल होत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Digijay Singh)यांनी ट्विट केले आहे. दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा राफेल विमानाच्या खरेदी किंमत काय असे विचारून या करारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. (prime minister modi should tell the now) दिग्विजय सिंह आपल्या ट्विटमध्ये लिहितात, शेवटी राफेल विमान आले आहे. २०१२ मध्ये यूपीएने १२६ राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांपैकी १८ विमाने सोडून उर्वरित एचएएलकडून भारतात तयार करायची होती. हे भारताच्या स्वावलंबी बनण्याचे प्रमाण होते. एका राफेल विमानाची किंमत ७४६ कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. मोदी सरकार आल्यानंतर मोदींनी संरक्षण आणि वित्त मंत्रालय, तसेच मंत्रिमंडळ समितीच्या परवानगीशिवाय फ्रान्सबरोबर नवीन करार केला आणि एचएएलचा अधिकार खासगी कंपनीला देण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. राष्ट्रीय सुरक्षेकडे दुर्लक्ष करून १२६ राफेल विमाने खरेदी करण्याऐवजी केवळ ३६ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला, असे दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. एका राफेल विमानाची किंमत काँग्रेस सरकारने ७४६ कोटी रुपये इतकी निश्चित केली होती. परंतु, संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेरही अनेकदा मागण्या करूनही ‘चौकीदार महोदयांनी’ आजपर्यंत राफेल विमानांची खरेदी रुपयांना केली हे सांगण्यास टाळाटाळ केली आहे. का?, असा सवाल करत दिग्विजय यांनी याचे कारण ‘चौकीदाराची’ चोरी उघडकीस येईल, हे असल्याचे म्हटले आहे. ‘चौकीदार’ आता कृपया त्याची किंमत सांगा, असे आवाहनही त्यांनी पंतप्रधान मोदी यांना केले आहे. ही बातमी वाचा: राष्ट्रीय सुरक्षेचे मूल्यांकन करताना संरक्षण मंत्रालयाने १२६ राफेल विमाने खरेदी करण्याची शिफारस केली होती. ही शिफारस यूपीएने मान्य करण्यास सहमती दर्शविली. आता मोदींनी १२६ ऐवजी ३६ राफेल खरेदी करण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न विचारला असताना कोणतेही उत्तर आले नाही, असे दिग्विजय यांनी म्हटले आहे. मोदींनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत तडजोड केली नाही का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हे पाहिलेच पाहिजे असे: असे प्रश्न विचारले तर मोदी यांची ट्रोल फौज आम्हाला देशद्रोही म्हणते असे मांडताना, लोकशाही व्यवस्थेत प्रश्न विचारण्याचा विरोधकांना अधिकार नाही का?, असा सवालही काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी विचारला आहे. ही बातमी वाचा: