जिनिव्हा: जगभरात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचे विधान केले आहे. करोनाला अटकाव करणारी लस उपलब्ध होण्यास काही कालावधी लागणार असून तोपर्यंत करोनासोबत जगायला शिकायला हवे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी म्हटले. त्याशिवाय त्यांनी युवकांनाही इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, करोनाच्या संसर्गासोबत राहण्याची सवय लावावी लागणार असून स्वत: सोबत इतरांचीही काळजी घ्यावी लागणार आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी काही देशांमध्ये पुन्हा एकदा निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधाचेही त्यांनी स्वागत केले. सौदी अरेबियाने लागू केलेल्या निर्बंधांचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, सौदी सरकारने उचलेली पावले कौतुकास्पद आहेत. सौदीने एका चांगले उदाहरण जगासमोर ठेवले आहे. बदललेल्या परिस्थितीत कोणती पावले उचलता येऊ शकतात, परिस्थितीशी कसे जुळवून घेता येईल, याबाबत त्यांनी उदाहरण ठेवले असल्याचे टेड्रोस घेब्रेयसस यांनी म्हटले. वाचा: वाचा: करोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका युवकांना असल्याचाही इशारा त्यांनी दिला. अनेक देशांमधील युवक करोनाच्या संसर्गाला साधारण आजार समजत आहे. मात्र, अशी समज ठेवणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. याआधीही जागतिक आरोग्य संघटनेने युवकांनाही करोनाची बाधा होऊ शकते असा इशारा दिला आहे. युवकांना बाधा होऊ शकते आणि करोनाचा संसर्ग फैलावू शकतात. त्यांनी आपल्या सुरक्षितेसह इतरांचीही काळजी घेण्याबाबत उपाय आखले पाहिजे असे टेड्रोस घेब्रेयसस यांनी म्हटले. वाचा: जगभरातील नागरिकांनी मास्क घालणे आणि सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. मागील काही दिवसात अमेरिका, ब्राझील, भारत, दक्षिण आफ्रिका आणि कोलंबियामध्ये परिस्थिती बिघडत असून त्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. वाचा: दरम्यान, नव्या अभ्यासानुसार, करोनाची दुसऱ्यांदा बाधा होण्याची शक्यता कमीच असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. करोनाबाधा दोन वेळा होऊ शकते का, या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञ खात्रीपूर्वक देऊ शकत नसले तरी अशी शक्यता जवळपास नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील काही विद्यापीठात याबाबत संशोधन झाले आहे. एकदा करोनाची बाधा झाल्यावर त्या संसर्गासाठी काही प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण होत असली, तरी ती किती काळ टिकेल, याबाबत साशंकता आहे. करोनामुक्त झालेले रुग्ण काही आठवड्यांनंतर पुन्हा पॉझिटिव्ह आल्याच्या काही घटना नोंदवण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या संसर्गाचे काही अवशेष या चाचण्यामध्ये आढळत असतील. त्यामुळेच त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे समोर येत असावी. त्याशिवाय अनेकदा करोनाची बाधा झाली असल्याचे सांगणारी चाचणी चुकीचे असल्याचे आढळले आहे. या अशा प्रकरणांमध्येही चाचणी चुकीच्या प्रकारे आढळत असेल असे म्हटले जाते.