बैरूत स्फोट: मृतांची संख्या १३५ वर, मदतीसाठी इतर देश सरसावले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 6, 2020

बैरूत स्फोट: मृतांची संख्या १३५ वर, मदतीसाठी इतर देश सरसावले

https://ift.tt/2C7X01O
बैरूत: लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या भीषण स्फोटातील बळींची संख्या १३५वर गेली आहे. स्फोटातील जखमींची संख्या पाच हजारांहून अधिक झाली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. लेबनॉनमधील 'रेड क्रॉस'च्या वतीने ही माहिती देण्यात आली. आग लागल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, हा हल्ला असण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. जगातील इतर देशांकडून मदत व बचाव कार्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे. दरम्यान, देशात दोन आठवड्याची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. बैरूतमधील मुख्य रस्ते इमारतींचे अवशेष आणि वाहनांच्या सांगाड्यांनी भरले आहेत. इमारतींचे मुख्य प्रवेशद्वार तर अक्षरश: उद्ध्वस्त झाले आहेत. घटनेनंतर रुग्णालयांमध्ये नागरिकांनी आप्तांची चौकशी करण्यासाठी गर्दी केली होती. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती, की आसपासच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. अनेक इमारतींमध्ये आग लागली. जवळपास तीन लाख लोक बेघर झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लेबनॉनमध्ये मदत व बचावकार्यासाठी इतर देशही सरसावले आहेत. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशियापासून युरोपीयन महासंघ, रशिया, अमेरिका आदी देशांनी मदत व बचावकार्यासाठी पथक पाठवली आहेत. यामध्ये मोबाइल हॉस्पिटल, श्वान पथकांचाही समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील लेबनॉनमध्ये आपली वैद्यकीय मदत पाठवली आहे. पाहा: स्फोटामुळे बंदरावरील धान्याचे कोठार नष्ट झाले असून, देशाला लागणाऱ्या एकूण धान्यापैकी ८५ टक्के धान्याचा साठा या ठिकाणी केला जातो. अर्थ आणि व्यापारमंत्री राउल नेहमो यांनी देशाला पुरेल, इतका धान्याचा साठा असल्याचा निर्वाळा दिला आहे. लेबनॉनमध्ये मुख्य बंदरच उद्ध्वस्त झाल्याने आवश्यक वस्तूंची आयात देशामध्ये कशी होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. बैरूतमध्ये आतापर्यंत झालेला हा सर्वांत भीषण स्फोट आहे. इस्राइलबरोबर लेबनॉनचा संघर्ष असून १९७५ ते १९९०दरम्यानच्या नागरी युद्धातही हा देश आघाडीवर होता. वाचा: वाचा: लेबनॉनचे गृहमंत्री महंमद फाहमी म्हणाले, '२७०० टन वजनाहून अधिक अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याचे दिसत आहे. एका नौकेवरून २०१४ मध्ये ते जप्त करण्यात आले होते. तेव्हापासून ते एका गोदामात ठेवण्यात आले होते.' 'विषारी नायट्रोजन डायऑक्साइडच्या स्फोटानंतर जशा ज्वाळा निघतात, तशा निघत होत्या. नागरी युद्धानंतर इतका मोठा स्फोट कधीच पाहिला नव्हता,' अशी प्रतिक्रिया मारवान रमादान या प्रत्यक्षदर्शी नागरिकाने व्यक्त केली.