मुंबई: ४० मैलावर एका नौकेत १५ मश्चिमार अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाची नौका पोहोचली आहे. समुद्र खवळलेला असल्यानं त्यांची नौका कोणत्याही क्षणी बुडण्याची शक्यता आहे. नौका बुडण्याची भीती असूनही मच्छीमार नौका सोडण्यास तयार नसल्याची माहिती आहे. त्यांची हरतऱ्हेने समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी गोराई जवळ बुडालेल्या नौकेचे भाग तटरक्षक दलाच्या विमानाला आढळले आहेत. बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी वरळीहून नौका पोहोचली आहे.