भटिंडा : मोदी सरकारनं आणलेल्या कृषिविषयक विधेयकाविरुद्ध पंजाबमध्ये शेतकऱ्यांतील खदखदता असंतोष आता उघडपणे बाहेर पडू लागलाय. शुक्रवारी सकाळी पंजाबच्या बादल गावातील एका शेतकऱ्यानं माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या घरासमोरच विष घेत केला. लोकसभेत कृषि विधेयक संमत झाल्यानंतर शेतकरी चिंताग्रस्त आहेत, असं 'भारतीय किसान युनियन एकता'चे राज्य सचिव शिंगारा सिंह यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, २०२०, शेतमाल हमी भाव आणि शेती सेवा करार (सबलीकरण आणि संरक्षण) विधेयक, २०२० आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, २०२० ही तीन विधेयकं गुरुवारी लोकसभेत मांडण्यात आली होती. यातील पहिल्या दोन विधेयकांना मंजुरी मिळाली आहे. या विधेयकांमुळे आपल्याला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६० वर्षीय शेतकऱ्यानं शुक्रवारी आपल्या सहकारी आंदोलकांना विषारी पदार्थ खाण्याबद्दल माहिती दिली. यानंतर शेतकऱ्यांना ताबडतोब अॅम्ब्युलन्स सेवेला फोन करून मदत मागितली तसंच आंदोलन स्थळी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली. संबंधित बातम्या : वाचा : वाचा : वाचा : त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत शेतकऱ्याला बादल गावातील एका रुग्णालयात दाखल केलं. विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय. नरेंद्र मोदी सरकारकडून लोकसभेत मांडल्या गेलेल्या आणि बहुमतानं संमत झालेल्या या विधेयकांविरोधात माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या घरासोर बादल गावातील शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून आंदोनल करत आहेत. १५ सप्टेंबरपासून आपल्या विरोध प्रदर्शनाला सुरुवात करत या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे विधेयक परत घेण्याची मागणी केलीय. याच दरम्यान केंद्रीय मंत्री यांनी केंद्रीय मंत्रीपरिषदेचा राजीनामा दिलाय. सोबतच शिरोमणि अकाली दलानं एनडीए सरकारकडून आपलं समर्थन मागे घेतलंय. इतर बातम्या : वाचा : वाचा :