मुंबई: काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या वादाच्यावरून ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असतानाच रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी या नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करा, असा सल्ला रामदास आठवले यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि यांना दिला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या अंतर्गत वादावर भाष्य केलं. काँग्रेसवर आरोप करण्यापेक्षा कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी भाजपमध्ये सामिल व्हावं. आम्ही त्यांचं स्वागतच करू, असं आठवले यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार आता सत्तेत येत राहणार आहे. एनडीए सत्तेतून लवकर बाहेर जाणं कठीण आहे. तसेच भाजपशी हात मिळवणी केल्याचा तुमच्याच नेत्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे. त्यामुळे तुम्ही ज्योतिरादित्य सिंधियांसारखे बंड करा. भाजपमध्ये सामिल व्हा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून वाद आहे. राहुल गांधी यांनी सिब्बल आणि आझाद यांच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सिब्बल आणि आझाद यांना आवाहन करतो की त्यांनी काँग्रेसचा राजीनामा द्यावा. काँग्रेस वाढवण्यासाठी त्यांनी आयुष्याची अनेक वर्षे दिली. आता त्यांनी भाजपमध्ये सामिल व्हावं, असंही ते म्हणाले. तुमचा एवढाच अपमान होत असेल तर ज्योतिरादित्य सिंधियांसारखी कणखर भूमिका घ्या. सचिन पायलट यांनीही अशीच कणखर भूमिका घेतली होती. नंतर त्यांनी माघार घेतली. काँग्रेससाठी खस्ता खाणाऱ्या नेत्यांवर राहुल गांधी यांनी आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार लवकर सत्तेतून बाहेर जाणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत रालोआला ३५० पेक्षाही अधिक जागा मिळतील. भाजप हा जनतेचं प्रतिनिधीत्व करणारा पक्ष आहे. सर्व जाती, धर्म, पंथाचे लोक या पक्षात काम करत आहेत. या पक्षाची विजयाची घोडदौड सुरूच राहणार असून काँग्रेसला मोठा पराभव सहन करावा लागणार आहे, असा दावाही त्यांनी केला.