ऑनलाकची प्रकिया सुरू असताना ऑगस्ट महिन्यात बसला 'हा' धक्का - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 2, 2020

ऑनलाकची प्रकिया सुरू असताना ऑगस्ट महिन्यात बसला 'हा' धक्का

https://ift.tt/31NJwlG
नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. भारत देखील या गोष्टीला अपवाद नाही. मागणी कमी झाल्याने अनेकांना नोकरी गमवावी लागली. सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आर्थिक आघाडीवर चलचाली सुरू झाला असल्या तरी अद्याप बेरोजगारी वाढत चालली आहे. वाचा- जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट मध्ये पुन्हा एकदा बेरोजगारी दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ऑगस्ट महिन्यात बेरोजगारीचा दर ८.३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे गेल्या म्हणजे जुलै महिन्यात अनेक गोष्टींना सुरुवात झाल्यामुळे जुलै महिन्यात हा दर ८.३५ टक्के इतका होता. वाचा- बेरोजगारीच्या बाबत ग्रामीण भागातील परिस्थितीत आणखी खराब असल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सीएमआयईच्या रिपोर्टनुसार, ऑगस्ट महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला आहे. भारतात ऑगस्ट महिन्यात तो ८.३५ टक्के इतका नोंदला गेला आहे. तर जुलै महिन्यात तो ७.४३ टक्के इतका होता. ऑगस्टमध्ये शहरी भागात बेरोजगारीचा दर ९.८३ टक्के तर ग्रामीण भागात ९.१५ टक्के इतका नोंदवला गेलाय. हाच दर जुलै महिन्यात शहरात ९.१५ आणि ग्रामीण भागात ६.६ टक्के इतका होता. वाचा- जुलै महिन्यातील परिस्थिती पाहता ऑगस्ट महिन्यात त्यात सुधारणा होईल असे वाटले होते. पण परिस्थिती सुधारण्या ऐवजी आणखी खराब झाली. शहरी भागात जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात बेरोजगारीचा दर १२.२ टक्क्यांवरून ९.१५ टक्क्यांवर आला होता. तर ग्रामीण भागात तो १०.५२ टक्क्यांवरून ६.६६ टक्क्यांवर आला होता. कृषी क्षेत्रातील काम कमी झाल्याने प्रवासी मजूर शहराकडे येत आहेत. पण अद्याप उत्पादन क्षेत्र आणि अन्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने काम सुरू झाले नाही. त्यात मागणी देखील कमी आहे. यामुळे बेरोजगारीची समस्या वाढत चालली आहे.