अभिनंदनची सुटका करा, अन्यथा भारताचा हल्ला; पाक मंत्र्याला होती भीती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 29, 2020

अभिनंदनची सुटका करा, अन्यथा भारताचा हल्ला; पाक मंत्र्याला होती भीती

https://ift.tt/3oFymZU
इस्लामाबाद: भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर वर्धमान यांना मागील वर्षी पाकिस्तानच्या सैन्याने अटक केली होती. त्यानंतर काही तासांतच त्यांची सुटका करण्यात आली होती. अभिनंदन यांच्या मुद्यावरून पाकिस्तानमध्ये अद्यापही राजकारण सुरू आहे. अभिनंदन यांना न सोडल्यास भारत हल्ला करेल अशी भीती परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी व्यक्त केली असल्याचा दावा खासदार अय्याज सादिक यांनी केला. त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. अय्याज सादिक यांनी संसदेत म्हटले की, कुलभूषण जाधवसाठी आम्ही अध्यादेश आणला नाही. सरकारने हा अध्यादेश दोन-तीन महिने लपवून ठेवला. कुलभूषण प्रकरणात हे सरकार झुकत असल्याचे चित्र आहे. यावेळी अभिनंदन वर्धमान यांच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. अभिनंदनच्या मुद्यावर असलेल्या बैठकीत पंतप्रधान इम्रान खान यांनी येण्यास नकार दिला. तर, परराष्ट्र मंत्री महमूद कुरैशी हे थरथर कापत होते. त्यांच्या डोक्यावर घाम होता. त्यांनी या बैठकीत सांगितले की, अभिनंदनला सोडण्यासाठी मान्यता द्या, अन्यथा रात्री ९ वाजता भारत पाकिस्तानवर हल्ला करणार आहे. वाचा: वाचा: वाचा: अय्याज यांनी सांगितले की, भारत पाकिस्तानवर हल्ला करणार नव्हता. सरकारला गुडघे टेकवण्यास भाग पाडणे हे भारताचे उद्दिष्ट होते आणि ते साध्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी भारताच्या हवाई दलाने बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला होता. पाकिस्तानचे काही लढाऊ विमाने भारताच्या दिशेने आले होते. त्यांना पिटाळून लावण्यासाठी अभिनंदन यांनी इतर सहकाऱ्यांसह मिग-२१ विमानाने उड्डाण घेतले होते. वाचा: विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यावेळी स्थानिकांच्या मदतीने पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशीही करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ प्रसारीत करून पाकिस्तानने आपली चांगली बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला होता. अभिनंदन यांना एक मार्च रोजी अटारी-वाघा सीमेवरून भारतात पाठवण्यात आले होते.