आंध्र-तेलंगणात पावसाचा कहर; आतापर्यंत २५ लोक ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 15, 2020

आंध्र-तेलंगणात पावसाचा कहर; आतापर्यंत २५ लोक ठार

https://ift.tt/3lSoZn5
हैदराबाद: आणि तेलंगणमध्ये धालेल्या मुसळाधार पावसामुळे आतापर्यंत एकूण २५ लोक ठार झाले आहेत. यांपैकी तेलंगणमध्ये १८ लोक ठार झाले असून आंध्र प्रदेशात ७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बचाव कार्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून लोकांना वाचवण्यासाठी राज्य सरकारांच्या मदतीने भारतीय लष्कर देखील या मोहिमेत सहभागी झाले आहे. पावसामुळे हैराण झालेले तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचित केली. आवश्यक ती सर्व मदत आणि आंध्र प्रदेशला दिली जाईल असे आश्वासन या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याची माहिती दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या निसर्गाच्या संकाटामुळे झालेल्या नुकसानाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान, केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी हैदराबादमधील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. या वेळी लोकांना योग्य ती मदत वेळेवर न मिळाल्याबाबत राज्यमंत्र्यांनी जीएएमसीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. रेड्डी यांनी जलद गतीने मदत पोहोचवण्याबाबत जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. पूर्व गोदावरीमध्ये अनेक घरे जलमय आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरीमध्ये अनेक घरे जलमय झाली आहेत मुसळधार पावसामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. गंभीर परिस्थिती पाहता मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. अधिकाऱ्यांनी हाय अॅलर्टवर राहावे आणि मदत शिबिरांमध्ये आश्रय घेणाऱ्या पीडित नागरिकांना आवश्यक ती मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिले आहेत. तसेच शिबिरातील प्रत्येक व्यक्तीला ५०० रुपये देण्याची देखील घोषणा केली. चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस कोसळला असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे लोक आश्रयाच्या जागा शोधत आहेत. इतकेच नाही, तर शहरातील रुग्णालये आणि पोलिस ठाण्यामध्ये देखील पावसाचे पाणी शिरले आहे. हैदराबाद-विजयवाडा हायवेवर देखील पुराचे पाणी साचले आहे. येथे कमरेइतके पाणी साचले आहे. या पाण्यात वाहून जाण्याचा धोका असल्याने लोक एकमेकांच्या हातांना धरून पाण्यातून बाहेर पडताना दिसत आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि पाहा-