सांगली: भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचा पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा इरादा औटघटकेचा ठरला. स्वत:ची संघटना वाढवण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा बोलून दाखवणारे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख यांनी काही तासातच पुणे पदवीधर मतदार संघातून माघार घेत, भाजपच्या उमेदवारास पाठबळ देत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, भाजपवर दबाव टाकण्यासाठी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी केलेला जवळकीची प्रयत्नही अपयशी ठरला. जुने सहकारी यांनी फटकारल्याने खोतांची राजकीय कोंडी झाली आहे. वाचा: माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्याशी फारकत घेऊन स्वतःची स्थापन केली. भाजपशी जवळीक करून राज्यमंत्री पदही मिळवले. मात्र, सत्तेतून पायउतार होताच खोतांची अस्वस्थता वाढलेली दिसत आहे. पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी रयत क्रांती संघटनेचा उमेदवार रिंगणात उतरवला. प्रा. एन. डी. चौगुले यांचा अर्ज भरून त्यांनी एकप्रकारे भाजपविरोधातील नाराजीच व्यक्त केली. चार दिवसांपूर्वी इस्लामपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर निशाणा साधला. संघटनेचा विस्तार करण्यासाठी नगरपालिकेसह पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्याही निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पक्षवाढीसाठीच रयत क्रांतीचा उमेदवार पदवीधरच्या रिंगणात उतरवल्याचे त्यांनी जाहीर केले होते. पण पक्षवाढीचा त्यांचा इरादा फार काळ टिकला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत बैठक होताच खोतांनी विरोधाची तलवार म्यान केली. वाचा: पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारास फायदा होईल असे कृत्य रयत क्रांती संघटना करणार नाही, असा शब्द सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. एकीकडे भाजपविरोधात नाराजी व्यक्त करताना सदाभाऊ खोत यांनी जुने मित्र राजू शेट्टी यांच्याशी जवळीकीचा प्रयत्न सुरू केला होता. राजू शेट्टी आणि माझ्यात वैचारिक मतभेद नाहीत, असे सांगत त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले होते. मात्र, शेट्टी यांनी खोतांना फटकारले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समिती स्थापन करून खोतांना हाकलले आहे, यामुळे पुन्हा त्यांना सोबत घेण्याची अजिबात शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय खोतांच्या भाजप जवळीकीवरूनही निशाणा साधला. खोतांना भाजपसमोर पुन्हा नमते घ्यावे लागले, तर जुन्या मित्रानेही फटकारले. शिवाय जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांसोबतही दुरावा वाढल्याने त्यांची राजकीय कोंडी झाली आहे. वाचा: