गाझियाबाद: उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे (two ). ही टोळी बनून लोकांच्या घराची पाहणी करत असे. त्यानंतर दरोडा टाकत असे. 'भिकाऱ्यांच्या' या टोळीने आतापर्यंच १०० दरोडे टाकले असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. इतकेच नाही, तर पोलिसांनी तीन फूट खोल जमिनीत पुरलेले सामान देखील जप्त केले आहे. या टोळीने एकूण सव्वा कोटी रुपयांची चोरी केल्याचे उघड झाले आहे. या चोर आणि दरोडेखोरांच्या टोळीचा प्रमुख मुखलाल याला त्याच्या दोन चतूर साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या टोळीकडून २२ लाख रुपयांहून अधिक रोकड आणि सुमारे ४५ लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. इतकेच नाही चलनातून बाद झालेल्या जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा देखील पोलिसांना या टोळीकडे आढळल्या. भिकारी आणि भंगारवाले बनून करत होते रेकी या टोळीमध्ये महिलांचा देखील समावेश होता असे अटक केलेल्या दरोडेखोरांनी पोलिसांना सांगितले. हे चोर दिवसा भिकारी किंवा भंगारवाले बनून वसाहतींमध्ये फिरत असत आणि ज्या घरांवर दरोडा टाकायचा आहे अशी घरे हेरून ठेवत असत. त्यानंतर रात्री त्या घरात चोरी करून ते फरार होत असत. त्यांनी आतापर्यंत १०० हून अधिक घरांमध्ये चोरी केल्याचे मान्य केले आहे. पोलिस आता या टोळीच्या इतर सदस्यांना शोधत आहेत. क्लिक करा आणि वाचा- १५ वर्षांपासून सक्रीय होती टोळी ही गेल्या १५ वर्षांपासून पश्चिम उत्तर प्रदेशात सक्रिय होती. अटक करण्यात आलेले आरोपी हे मुरादनगर येथे राहणारा मुखलाल आणि नूरनगरच्या झोपडपट्टीत राहणारा सलमान हे ही संपूर्ण टोळी चालवत होते. टोळीप्रमुख मुखलाल यापूर्वी १० वेळा अटक झालेला आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-