नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना केंद्रीय रेल्वे मंत्री तसंच वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी नाही तर आणि डाव्यांच्या हातात गेल्याचा दावा पीयूष गोयल यांनी केलाय. आपला अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोयल यांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्याला बळी पडून शेतकऱ्यांनी सरकारशी चर्चा करू नये, अशी विनंतीही गोयल यांनी केलीय. ते ''शी संवाद साधत होते. माओवाद्यांकडून आणि डाव्यांकडून शेतकऱ्यांना भडकावलं जातंय. शेतकऱ्यांसाठी सरकारचे दरवाजे नेहमीच खुले आहेत. सरकार प्रत्येक मुद्यावर आहे, असंही त्यांनी म्हटलंय. वाचा : वाचा : या कायद्यामुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. काही थोड्या लोकांसाठी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देता येणार नाही, असं सांगतानाच हे कायदे मागे घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. शेतकरी विधेयकातील तरतुदींवर चर्चा करू इच्छित असतील तर सरकारशी त्यांनी संपर्क साधावा. चर्चेसाठी सरकार केव्हाही तयार आहे. राहिला प्रश्न एमएसपी अर्थात किमान हमीभावाचा तर लोकसभेपासूनच शेतकऱ्यांना हे आश्वासन देण्यात आलंय की एमएसपी मागे घेतला जाणार नाही. एमएसपी सुरूच राहील. यंदा २३ टक्के अधिक शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्यात आलं. देशहिताचं असलेले हे कायदे शेतकरी नक्कीच समजून घेतील, अशी आशा गोयल यांनी व्यक्त केली. वाचा : वाचा :