सगळं काही तुमच्यासाठी, पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना साद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 12, 2020

सगळं काही तुमच्यासाठी, पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना साद

https://ift.tt/2IEWknE
नवी दिल्ली : यांनी शनिवारी भारतीय वाणिज्य व उद्योग संघाच्या (FICCI) ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि वार्षिक बैठकीच्या उद्घाटन सत्राला डिजिटल माध्यमातून संबोधित केलं. यावेळी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विधेयकांवर शेतकरी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. 'कृषी क्षेत्र आणि शेती, पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, स्टोरेज, कोल्ड चैन यांसारख्या इतर क्षेत्रांदरम्यान काही अडथळे आढळले, या सगळ्या अडचणी हटवण्याचा प्रयत्न केला जातोय. या सुधारणेनंतर नवीन बाजारपेठ, नवीन पर्याय आणि तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल. देशातील कोल्ड स्टोरेजच्या पायाभूत सुविधा अत्याधुनिक असतील. या सर्व कृषी क्षेत्रात अधिक गुंतवणूक होईल. या सर्व गोष्टींचा माझ्या देशातील शेतकऱ्याला सर्वाधिक फायदा होणार आहे, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. वाचा : वाचा : आज भारतातील शेतकऱ्यांके आपली पिकं बाजार समित्यांसोबतच बाहेरही विकण्याचा पर्याय आहे. आज भारतात बाजार समित्यांचं आधुनिकीकरण होत आहे, शेतकऱ्यांना डिजिटल व्यासपीठावर पिकांची विक्री व खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, हाच यामागचा प्रामाणिक प्रयत्न आहे. देशातील शेतकरी समृद्ध व्हायला हवा. जेव्हा देशातील शेतकरी समृद्ध झाला तर देशही समृद्ध होईल, असंही यावेळी पंतप्रधानांनी म्हटलंय. अर्थव्यवस्थेबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या अर्थव्यवस्थेला क्षेत्राच्या अडथळ्याची गरज नाही तर यांना एकमेकांशी सांधण्यासाठी आणि एकमेकांना आधार देण्यासाठी पुलाची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत असे अडथळे दूर करण्यासाठी काही सुधारणा केल्या आहेत. गेल्या सहा वर्षांत भारतानंही असं सरकार पाहिलंय जे केवळ आणि केवळ १३० कोटी देशवासीयांना पुढे नेण्यासाठी झटत आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या १७ दिवसांपासून शेतकरी कृषी विधेयकाविरोधात राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या जवळपास डझनभर चर्चेनंतरही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघू शकलेले नाही. वाचा : वाचा :