सात एसी लोकलमधून १२० प्रवाशांचाच प्रवास - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 18, 2020

सात एसी लोकलमधून १२० प्रवाशांचाच प्रवास

https://ift.tt/37s5qxC
म. टा. प्रतिनिधी, मुंबई मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर गुरुवारी सुरू करण्यात आली. मात्र पहिल्या दिवशी रात्री सव्वाआठ वाजेपर्यंत सात लोकमधून केवळ १२० प्रवाशांनीच प्रवास केला. रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली. लोकलमुभा असलेल्या अत्यावश्यक प्रवाशांपैकी दोन प्रवाशांनी पास काढून, तर उर्वरित प्रवाशांनी तिकीट घेत या लोकलने प्रवास केला. दरम्यान, सामान्य लोकलच्या जागी वातानुकूलित लोकल चालवण्यात आल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील काही प्रवाशांनी नापसंती दर्शवली. सामान्य लोकल रद्द केल्यामुळे या लोकलमधील प्रवासी अन्य लोकल फेऱ्यांवर अवलंबून आहेत. पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकललादेखील थंड प्रतिसाद आहे. यामुळे आधीच कमी प्रवासी संख्या असताना खरेच वातानुकूलित लोकल चालवण्याची गरज आहे का, अशी चर्चा या निमित्ताने प्रवाशांमध्ये सुरू झाली आहे.