दिल्लीकडे कूच करतायत आणखी १०,००० शेतकरी; तीव्र होणार आंदोलन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 14, 2020

दिल्लीकडे कूच करतायत आणखी १०,००० शेतकरी; तीव्र होणार आंदोलन

https://ift.tt/3oOHjzg
नवी दिल्ली: आज सोमवारी शेतकरी कृषी कायद्यांविरोधात () उपोषण करत आहेत. या शेतकरी आंदोलनाला () अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने आणखी १० हजार शेतकरी दिल्ली-हरयाणा सीमेवर पोहोचणार आहे. राजस्थान सीमेवरून हजारो शेतकरी राजधानीच्या दिशेने कूच करण्याच्या तयारीत आहेत. राजस्थानहीन दिल्लीच्या दिशेने चालले शेतकरी रविवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दिल्ली-जयपूर महामार्गावर जयसिंह खेडाजवळ पोलिसांनी राजस्थानहून दिल्लीच्या दिशेने कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखले. या मुळे तेथील वाहतूक देखील बंद झाली. शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता अलवर प्रशासनाने वाहतूक बेहरोर-तातरपूर खैरताल मार्गावर वळवली आहे. साडे तीन तासांनंतर दिल्लीहून आलेल्या वाहनांसाठी हा मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र शेतकऱ्यांनी वाहतूक अडवलेली नसल्याचे राजस्थानचे शेतकरी नेते अमरा राम यांनी म्हटले आहे. आम्हाला रोखण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्समुळे वाहतूक अडली असल्याचे ते म्हणाले. आम्हाला केवळ दिल्लीला जायचे आहे, असे ते पुढे म्हणाले. सिंघू बॉर्डरवर पोहचणार आणखी २००० ट्रॅक्टर ट्रॉली सिंघू बॉर्डरवर शेतकरी दीर्घकालीन तयारीसोबत आलेले आहेत. मोगाचे शेतरी गुरुनाम सिंह आपल्या संपूर्ण कुटुंबासह या आंदोलनासाठी आले आहेत. जितके महिने आवश्यकता असेल, तितके महिने आम्ही येथे राहू. जर सरकारला वाटत असेल की आम्ही भुकेने मरू, तर ते चुकीचे आहे. आम्ही सर्व योद्धे आहोत आणि आम्ही योद्ध्यासारखेच लढू, असे गुरुनाम सिंह म्हणाले. कमीतकमी आणखी २००० ट्रॅक्टर येथे पोहचणार असल्याचे पहिल्या दिवसापासून सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याने म्हटले आहे. प्रत्येक ट्रॅक्टरवर कमीतकमी चार लोक आहेत. दिल्लीचे गगनप्रीत सिंह हे आंदोलक शेतकऱ्यांना जेवण पुरवत आहेत. त्यांनी आपल्या मित्रांनाही सिंघू बॉर्डरवर बोलावले आहे. क्लिक करा आणि वाचा- दिल्लीचे सर्व एंट्री पॉइंट जाम करण्याची तयारी दिल्लीचे सर्व एंट्री पॉइंट जाम करण्याची शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. या बरोबरच त्यांना राजधानीचे सर्व मुख्य रस्ते देखील जाम करायचे आहेत. आम्ही समस्या निर्माण करू इच्छित नाही, मात्र आमची दखल घेतली जावी इतकेच आम्हाला वाटते, असे मन्नत सिंह या आंदोलक शेतकऱ्याने म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-