...तर ३१ डिसेंबरच्या रात्री संचारबंदी लागणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 11, 2020

...तर ३१ डिसेंबरच्या रात्री संचारबंदी लागणार

https://ift.tt/3n36LQW
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाचा धोका अद्याप पूर्णतः संपलेला नसतानाही अनेक ठिकाणच्या नाइट क्लब्जकडून सुरक्षित वावराच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे आढळले आहे. येत्या २५ डिसेंबरला नाताळ आणि ३१ डिसेंबरला नववर्ष स्वागताच्या पार्ट्या क्लब्जकडून आयोजित होण्याची शक्यता आहे. केवळ मौजमजा करण्याच्या नावाखाली नागरिक मोठ्या प्रमाणात, नियम न पाळता एकत्रित आल्यास करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढेल, अशी भीती व्यक्त करत, येत्या २० डिसेंबरपर्यंत हे चित्र सुधारले नाही तर २० नंतर मुंबईत रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत लागू केली जाईल, असा इशारा पालिका यांनी गुरुवारी दिला. मुंबईत कायम असतानाही नाइट क्लबकडून रात्रीच्या पार्ट्या आयोजित करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. या पार्ट्यांमध्ये सुरक्षित वावराचे नियम आणि मास्कची सक्ती धाब्यावर बसवली जात असल्याचे आढळते आहे. लोअर परळ व वांद्रे येथील काही क्लबमध्ये हे धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पालिकेने खबरदारीसाठी पावले उचलली आहेत. ज्याप्रमाणे दिवाळी, गणपती, दसरा, ईद हे सण असूनही मुंबईकरांनी ते सावधपणे आणि साधेपणाने साजरे केले हे पाहता, नाताळ आणि ३१ डिसेंबरलाही नागरिकांनी जास्त गर्दी करू नये, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. सध्या लग्नसराईचा मोसम आहे. त्यामुळे संचारबंदीसारखे पाऊल उचलून नागरिकांच्या आनंदावर विरजण टाकण्याचा पालिका आणि राज्य सरकारचा विचार नाही. मात्र नाइट क्लबमधील धक्कादायक प्रकार पाहता यापुढे क्लबनी करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना नियमांचे काटेकोरपणे पालन केले नाही, गर्दी सुरूच ठेवली तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी रात्री ११ नंतर संचारबंदी लागू करण्याची शिफारस शासनाला करावी लागेल, असे आयुक्तांनी नमूद केले. मुंबईतील नाईट क्लब मालकांना पालिकेने १५ दिवसांची मुदत दिली असून, या अवधीत त्यांनी क्लबांत शिस्त आणणे अपेक्षित आहे, असे आयुक्त म्हणाले.