मुंबईत मित्राची हत्या करून झाला होता फरार; ८ वर्षांनी यूपीत अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 2, 2021

मुंबईत मित्राची हत्या करून झाला होता फरार; ८ वर्षांनी यूपीत अटक

https://ift.tt/3pKedRM
गोरखपूर: मुंबईत आठ वर्षांपूर्वी मित्राची हत्या करून पसार झालेल्या मारेकऱ्याला एसटीएफने बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याला महाराष्ट्र पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आरोपीने २०१२मध्ये आपल्या शेख नावाच्या मित्राची हत्या केली होती. आरोपी गोरखपूरमध्ये लपून बसल्याची माहिती एसटीएफला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी इनामुल हक याला रेल्वे स्थानकाजवळून अटक केली. मूळचा कोलकाता येथील रहिवासी इनामुल हक हा ठाण्यात राहात होता. कोलकात्यातील मालदा मलिन चौक गोपालपूर टोले येथील ताजमुल दुक्खी शेख हा तरुणही त्याच्यासोबत राहात होता. दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. त्यावेळी इनामुल याने १० सप्टेंबर २०१२ रोजी रात्री ताजमुलची हत्या केली आणि फरार झाला. महाराष्ट्र पोलीस आरोपीचा शोध घेत होते. आरोपी उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी तातडीने उत्तर प्रदेश एसटीएफला माहिती दिली. त्यानंतर एसटीएफने आरोपीला अटक करण्यासाठी सापळा रचला. उत्तर प्रदेश एसटीएफने आरोपीला अटक करण्यासाठी अनेकदा छापेमारी केली. मात्र, आरोपी त्यांच्या हाती लागला नाही. शुक्रवारी गोरखपूर पोलीस आणि गुन्हे शाखेने संयुक्तपणे कारवाई करून गोरखपूर रेल्वेस्थानकाजवळून आरोपीला अटक केली.