कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थानातही वातावरण तापलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 7, 2021

कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थानातही वातावरण तापलं

https://ift.tt/2OfIRoX
नवी दिल्ली : पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी शनिवारी आपले ट्रॅक्टर आणि ट्रेलर रस्त्यांच्या मध्ये लावून सुमारे तीन तास वाहतूक रोखून धरली. नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांनी शनिवारी '' पुकारला होता. बऱ्याच ठिकाणी निदर्शनांमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. शेतकरी आंदोलनाच्या परिसरातील इंटरनेट बंदी; तसेच प्रशासनाकडून आंदोलकांचा छळ होत असल्याचा आरोप करून 'चक्का जाम' पुकारण्यात आले होते. दरम्यान, तीन तासांचे 'चक्का जाम' शांततापूर्ण पार पडल्याचा दावा शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केला आहे. आंदोलनादरम्यान रुग्णवाहिका आणि स्कूल बसना अडविण्यात आले नाही, असेही त्यांनी सांगितले. दिल्ली सीमांवर सुरू असलेले आंदोलन विविध राज्यांतही पोहोचले आहे, असा दावा आंदोलकांनी केला आहे. पोलिसांनी वाहतूक वळविण्याचे नियोजन केले होते; तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. चंडीगड-झिराकपूर, अमृतसर-पठाणकोट, तरण तारण-कपूरथळा, फिरोझपूर-फाजिल्का, मुक्तसर-कोटकपुरा, भटिंडा-चंडीगड, लुधियाना-जालंधर, पंचकुला-पिंजोर, पटियाला-कैथाल, जिंद-कर्नाल, कर्नाल-कैथाल, अंबाला-चंडीगड, अंबाला-हिसार, मन्सा-सिरसा यासह काही महामार्ग आंदोलकांनी रोखून धरले होते. भारती किसान युनियनचे सुखदेव सिंग कोक्रीकलान यांनी सांगितले की, पंजाबमधील १५ जिल्ह्यांत ३३ ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले होते. या वेळी शेतकऱ्यांनी 'जय जवान, जय किसान' आणि 'किसान एकता जिंदाबाद' असे घोषणाफलक हाती घेतले होते; तसेच केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 'अन्नदात्यांचा शांततापूर्ण सत्याग्रह' 'अन्नदात्यांचा शांततापूर्ण सत्याग्रह देशहिताचा आहे. नवीन केवळ शेतकरी, कामगारांसाठीच नव्हे; तर देशाच्या जनतेसाठी हानिकारक आहेत,' अशी अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी ट्विटरच्या माध्यमातून दिली. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही पोलिसांनी केलेल्या बॅरिकेडिंगचे फोटो ट्विटरवर पोस्ट करून निषेध व्यक्त केला. तेलंगणमध्येही कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या 'चक्का जाम' आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तेलंगणमध्येही शनिवारी शेतकरी संघटनांनी निदर्शने केली. काही भागामध्ये रास्ता रोको करण्यात आला. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनीही आंदोलनात सहभाग घेतला. परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. कर्नाटकात आंदोलक ताब्यात कर्नाटकच्या विविध भागामध्ये शनिवारी चक्का जाम करण्यात आला. बेंगळुरू येथे आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. येळहंका पोलिस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राजस्थानमध्ये कोंडी राजस्थानमधील शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी बारा ते तीन या वेळामध्ये राजस्थानातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले. या रस्त्यांवरील वाहतुकीला त्याचा मोठा फटका बसला. राजस्थानमध्ये काँग्रेसने पहिल्यापासूनच या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकरी संघटनांसोबत राजकीय कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले होते. कोटा येथे ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. दिल्ली-जयपूर महामार्गही आंदोलनामुळे ठप्प होता. बाह्य दिल्लीच्या महामार्गांवर चक्काजाम आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रक आणि ट्रॅक्टर आडवे लावून पलवल महामार्गासह सोनिपत इस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस-वे कुंडली सीमेपाशी केजीपी-केएमपी येथे; तसेच दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्ग, राजस्थान-हरियाणा सीमेवरील शाहजहांपूर येथे राष्ट्रीय महामार्ग जाम केला. दरम्यान, रुग्णवाहिका, शाळांच्या बससह आणीबाणीच्या आणि आवश्यक सेवांसाठी आंदोलक वाट मोकळी करून देत होते. आंदोलन संपल्यावर वाहतूक बंद झाल्यामुळे अडकलेल्या लोकांना चहा आणि भोजन देऊन शेतकऱ्यांनी त्यांची माफी मागितली. इंटरनेट बंदीविरुद्ध याचिका दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी इंटरनेट सेवांवरील बंदी; तसेच रस्ते अडविण्यासाठी बांधलेले बॅरिकेड हटविण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. इंटरनेट हा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेच दिलेल्या निकालात म्हटले आहे, याकडे या याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनी गोळीबारात झालेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याचीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.