पोलिसांवर प्राणघातक हल्ला, चकमकीत एका आरोपीचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 10, 2021

पोलिसांवर प्राणघातक हल्ला, चकमकीत एका आरोपीचा मृत्यू

https://ift.tt/3pazP9f
कासगंज, : उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यात मंगळवारी पोलिसांवर करण्यात आलेल्या हल्ला प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी एन्काऊन्टरमध्ये ठार केलंय. हा आरोपीचं नाव मोती धीमर याचा भाऊ एलकार असल्याचं समजतंय. बुधवारी सकाळी पोलिसांची आरोपींसोबत चकमक घडली. कासगंज एसपी मनोज सोनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर आरोपींचा शोध सुरू होता. याच दरम्यान काली नदीच्या खादर भागात आरोपींशी पोलिसांची चकमक सुरू झाली. यामध्ये गोळी लागल्यानं मुख्य आरोपी मोती धीरम याचा भाऊ एलगार हा जखमी झाला. अंधाराचा फायदा घेत इतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. जखमी आरोपीला उपचारासाठी सिढपुराला नेण्यात आलं. इथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दारु माफियांकडून पोलिसांच्या टीमवर हल्ला मंगळवारी कासगंजच्या सीढपुरा भागातील नगरला धीमर नावाच्या गावात अवैध दारुविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी, आरोपींकडून पोलिसांवरच प्राणघातक हल्ला करण्यात आला. अवैध दारुविक्रीची सूचना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक पाल आणि पोलीस शिपाई देवेंद्र सिंह घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी दारु माफियांनी दोन्ही केला, त्यांचा गणवेशही फाडला. आरोपींनी पोलिसांना अत्यंत क्रूर रितीनं मारहाण करत अशोक पाल यांना रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून दिलं. तर शिपाई देवेंद्र सिंह यांना आपल्यासोबत बंधक बनवून नेलं. रक्तबंबाळ अवस्थेतील पाल यांच्यावर काही ग्रामस्थांची नजर गेल्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात धाडण्यात आलं. शिपाई देवेंद्र सिंह यांचा मृत्यू एसपी मनोज कुमार सोनकर यांनी अनेक पोलीस स्टेशनच्या पोलिसांना जंगलात शिपाई देवेंद्र सिंह यांच्या शोधासाठी पाठवलं. जवळपास तासाभराच्या शोधाशोधीनंतर जंगलात एके ठिकाणी शिपाई देवेंद्र सिंह अर्धनग्न आणि मरणासन्न अवस्थेत आढळले. त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांसाठी अलीगड रुग्णालयात नेण्यात येत असतानाच देवेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेनंतर दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गुन्हेगारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसंच शहीद पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करत ५० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि आश्रितांना सरकारी नोकरी देण्याचे निर्देश दिले आहेत. वाचा :